बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याने अभिनयात नशीब आजमावलं पण तिथे त्याचा फारसा जम बसू शकला नाही. काही मोजक्या चित्रपटात अरबाजने अभिनय केला पण आपला भाऊ सलमान खानसारखं प्रेक्षकांवर पकड घेण्यात तो अपयशी ठरला. नंतर अरबाजने त्याचं पूर्ण लक्ष निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे दिलं. नुकतंच ‘बॉलिवूड बबल’ या युट्यूब चॅनलवर अरबाज खानने एक टॉक शो सुरू केला आहे.

यानिमित्तानेच अरबाज खानने नुकतंच एक वक्तव्य केलं आहे ज्यात त्याने शाहरुख खानच्या होस्टिंगवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. शाहरुख खाननेही काही टेलिव्हिजन शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केलं आहे, शाहरुखचं सूत्रसंचालन तेवढं नैसर्गिक आणि उत्तम नसल्याचा खुलासा अरबाज खानने केला आहे.

salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
Saif ali khan
सैफ अली खानला मुंबईच्या जुहूमध्ये घ्यायचं होतं हक्काचं घर, पण….; अनुभव सांगत म्हणालेला, “इथे मुस्लीम…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”

आणखी वाचा : आईच्या साधेपणाबद्दल भाष्य करणारी कंगना रणौतची खास पोस्ट; फिल्म माफियालाही सुनावले खडेबोल

‘फ्रीप्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाजने याबद्दल भाष्य केलं आहे. शिवाय तो स्वतः ज्या पद्धतीने होस्टिंग करतो ते खूप सहज आणि नैसर्गिक असल्याचं त्याचं म्हणणं आहे. यामध्ये त्याने त्याचा भाऊ सलमान खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांचं उदाहरण दिलं आहे. तो म्हणाला, “दस का दम या कार्यक्रमातून सलमान खानने कमबॅक केलं, खुद्द बच्चन साहेब आजही कौन बनेगा करोडपतीचं सूत्रसंचालन करत आहेत. या दोघांचे फिल्मी करिअरदेखील अगदी उत्तम सुरू आहे. हीच गोष्ट शाहरुख खानला जमली नाही.”

पुढे अरबाज म्हणाला, “मला वाटतं शाहरुख खान छोट्या पडद्यावर निरागसता आणि नैसर्गिकता आणण्यात अपयशी ठरला. लोकांना तो खोटा किंवा बेगडी वाटला. टेलिव्हिजनवर काम करताना तुम्ही मुखवटे धारण करून राहू शकत नाही, त्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासारखं तुम्ही चलाख असायला हवं. बच्चनजी हे त्यांच्या प्रेक्षकांना ओळखून होते, शाहरुखला ही गोष्ट नेमकी जमली नाही.” अमिताभ बच्चन यांच्या अनुपस्थितीत शाहरुख खानने काही काळ ‘कौन बनेगा करोडपती’चं सूत्रसंचालन केलं होतं.

Story img Loader