सलमान खानच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अनेकांनी सलमानच्या ३५ वर्षांच्या करिअरमधील सर्वांत चांगला चित्रपट म्हणून या सिनेमाचे कौतुक केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. तसेच या ‘बजरंगी भाईजान’ची कथा सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे वडील व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. शूटिंगदरम्यान या चित्रपटामधील क्लायमॅक्सबाबत एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला होता.

हेही वाचा : “चिंता, काळजी आणि ट्रोल…” बाईक राईडच्या फोटोवर अमिताभ बच्चन यांचे स्पष्टीकरण

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Chhaava
जेव्हा विकी कौशलला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिलं तेव्हा…; अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “कोणी गोरागोमटा…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Hemant Dome
अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यात अनेक वर्षे होता अबोला; खुलासा करत म्हणाले, “खूप भयानक…”

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३२० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबत एस. एस. राजामौली यांनी काही सूचना दिल्या होत्या. ‘बजरंगी भाईजान’च्या क्लायमॅक्समध्ये शेवटी पत्रकार चांद नवाब (नवाजुद्दीन सिद्दिकी), मुन्नीला (हर्षाली मल्होत्रा) घरी सोडायला जातो, असे दाखवण्यात आले आहे. याऐवजी पवनने (सलमान खान) मुन्नीला घरी सोडले पाहिजे होते. याविषयी एका मुलाखतीदरम्यान सलमान खान म्हणाला होता की, “केवळ एस. एस. राजामौलीच नाही तर मला सुद्धा हाच क्लायमॅक्स अपेक्षित होता.”

हेही वाचा : कान्सच्या रेड कार्पेटवर नवरीसारखी सजली ‘सारा’, नेटकरी कौतुक करीत म्हणाले, “भारतीय पोशाखापेक्षा…”

याबाबत राजामौली यांनी आपल्या वडिलांनाही सांगितले होते. मुन्नीला आपल्या स्वगृही सोडण्यासाठी पवन पाकिस्तानात जातो परंतु पोलिसांनी आधीच अटक केल्यामुळे चांद नवाब मुन्नीला तिच्या आईशी भेट करून देतो. अगदी सलमान खानला सुद्धा तो स्वत: मुन्नीला तिच्या आईकडे देतो आणि त्यानंतर पोलीस अटक करतात, असा क्लायमॅक्स पाहिजे होता. परंतु काही कारणास्तव यात बदल करण्यात आला नाही.

दरम्यान, सलमानच्या अलीकडेच रिलीज झालेल्या ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवण्यात यश मिळवले आहे. लवकरच सलमान त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘टायगर-३’ मध्ये कतरिना कैफबरोबर झळकणार आहे.

Story img Loader