बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आज ५८ वर्षांचा झाला आहे. त्याच्या चित्रपट कारकि‍र्दीलाही ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. वयाच्या ८ व्या वर्षी ‘यादों की बारात’ या चित्रपटातून त्याने अभिनयाची कारकीर्द सुरू केली जी आजतागायत सुरू आहे. आमिरच्या परफेक्शनचे आपण अनेक किस्से ऐकले आहेत, मग ते ‘दंगल’साठी वाढवलेलं वजन असो किंवा ‘गजनी’ चित्रपटासाठी हटके लूक केला होता. मात्र एका सीनसाठी त्याने चक्क १२ दिवस अंघोळ केली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्व्दच दशक संपत असताना आमिर खानची चॉकलेट बॉय अशी ओळख झाली होती मात्र विक्रम भट्ट यांच्या ‘गुलाम’ चित्रपटातून आमिर खान पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसला. या चित्रपटात तो ऍक्शन करताना दिसून आला आहे. या चित्रपटात शेवटच्या सीनमध्ये गुंडांशी दोन हात करताना त्याला खराब दिसायचे होते आणि हा सीन मोठा असल्याने हा चित्रित करण्यासाठीदेखील त्यांना वेळ गेला होता. म्हणून आमिर खानने चक्क १२ दिवस अंघोळीला राम राम होता.

विजय वर्माबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्ना भाटियाने सोडलं मौन; म्हणाली “आम्ही एकत्र…”

आमिरचा ‘गुलाम’ हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यातील रेल्वेसमोर धावतानाच्या एका सीनमध्ये आमिर ट्रेनच्या खूप जवळ पोहोचला होता आणि मग त्याने बाजूला उडी मारली. यावेळी चित्रपटाच्या सेटवरील सगळेच जण टेंशनमध्ये होते. या चित्रपटात त्याच्याबरोबर राणी मुखर्जीदेखील होती.

चित्रपटांप्रमाणे त्यांचं खासगी आयुष्यदेखील कायम चर्चेत राहिलं आहे. पहिली पत्नी रीना घटस्फोट घेऊन त्याने किरण रावशी लग्न केलं मात्र नुकतेच हे दोघे आहेत. या नादात त्याने संपूर्ण टक्कल केलं होतं, सीम्मी गरेवालच्या एका मुलाखतीमध्ये खुद्द आमिरने हा किस्सा सांगितला होता.

नव्व्दच दशक संपत असताना आमिर खानची चॉकलेट बॉय अशी ओळख झाली होती मात्र विक्रम भट्ट यांच्या ‘गुलाम’ चित्रपटातून आमिर खान पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसला. या चित्रपटात तो ऍक्शन करताना दिसून आला आहे. या चित्रपटात शेवटच्या सीनमध्ये गुंडांशी दोन हात करताना त्याला खराब दिसायचे होते आणि हा सीन मोठा असल्याने हा चित्रित करण्यासाठीदेखील त्यांना वेळ गेला होता. म्हणून आमिर खानने चक्क १२ दिवस अंघोळीला राम राम होता.

विजय वर्माबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्ना भाटियाने सोडलं मौन; म्हणाली “आम्ही एकत्र…”

आमिरचा ‘गुलाम’ हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यातील रेल्वेसमोर धावतानाच्या एका सीनमध्ये आमिर ट्रेनच्या खूप जवळ पोहोचला होता आणि मग त्याने बाजूला उडी मारली. यावेळी चित्रपटाच्या सेटवरील सगळेच जण टेंशनमध्ये होते. या चित्रपटात त्याच्याबरोबर राणी मुखर्जीदेखील होती.

चित्रपटांप्रमाणे त्यांचं खासगी आयुष्यदेखील कायम चर्चेत राहिलं आहे. पहिली पत्नी रीना घटस्फोट घेऊन त्याने किरण रावशी लग्न केलं मात्र नुकतेच हे दोघे आहेत. या नादात त्याने संपूर्ण टक्कल केलं होतं, सीम्मी गरेवालच्या एका मुलाखतीमध्ये खुद्द आमिरने हा किस्सा सांगितला होता.