दिल्लीमध्ये ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला.

राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या लक्षवेधी बदलामुळे मंगळवारी राजकीय वादंग माजला. मोदी सरकार ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

MPSC Mantra  Gazetted Civil Services Joint Prelims Exam Intelligence Test
MPSC मंत्र : राजपत्रित नागरी सेवा सयुक्त पूर्व परीक्षा: बुद्धिमत्ता चाचणी
How the popularity of the game of Rubik cube has survived in the digital age
रुबिक क्यूबची पन्नाशी…. डिजिटल युगातही या खेळण्याची लोकप्रियता जगात कशी राहिली टिकून?
Hindustan Copper Limited Recruitment 2024 hcl junior manager 56 post bharati 2024 notification how to apply online
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ‘या’ विभागांत ५६ पदांसाठी भरती सुरू, पगार एक लाखांच्यावर, असा करा अर्ज
Sengol in Lok Sabha controversies myths history and reality about Sengol
लोकसभेतील सेंगोलवरुन पुन्हा वाद होण्याची चिन्हे; काय आहेत सेंगोलबाबतची मिथकं, वाद, इतिहास आणि वास्तव
paper leak sanjeev mukhiya
NEET-UG पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड संजीव मुखिया कोण आहे?
vasai aarti yadav murder case
आरती यादव हत्या प्रकरण: हत्येचे चित्रण करणार्‍या १४ जणांचे नोंदविले जबाब
Preparation for mpsc Geography Main Exam mpsc exam
mpsc ची तयारी: भूगोल (मुख्य परीक्षा)
What Kapil Sibal Said?
ईव्हीएम प्रकरणावर कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया, “राजीव चंद्रशेखर हे एलॉन मस्कपेक्षाही…”

आणखी वाचा : Sanatan Dharma row: उदयनिधींच्या वादग्रस्त विधानाचा शाहरुखच्या ‘जवान’ला बसणार फटका; ‘बॉयकॉट जवान’ ट्रेंड होण्यामागे ‘हे’ आहे कारण

या प्रकरणाबद्दल सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली असून वेगवेगळ्या स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. ‘इंडिया’चं नाव बदलून ‘भारत’ झाल्यावर काय काय बदल घडू शकतात याबद्दलही जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या विषयाची वेगवेगळी मीम्सदेखील व्हायरल होत आहेत.

आता नुकतंच यावर बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी भाष्य केलं आहे. मीडियाशी संवाद साधताना जॅकी श्रॉफ म्हणाले, “जर कुणी भारतला भारत म्हणत असेल तर काय वाईट आहे. इंडिया असेल तर इंडिया किंवा भारत असेल तर भारत याने काय फरक पडतोय. माझं नाव जॅकी आहे, कुणी मला जॉकी म्हणतं, जेकी म्हणतं पण यामुळे मी नाही बदलणार मी आहे तोच माणूस राहणार आहे, नाव बदलल्याने ओळख कुठे बदलते?”

अद्याप या प्रकरणावर कोणताही ठोस निर्णय समोर आला नसल्याने याची केवळ सोशल मीडियावरच चर्चा आहे.