बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमान एका अवॉर्ड शोच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. पत्रकार परिषदेत दबंग खान मनमोकळेपणाने बोलला. बॉक्स ऑफिसवर चित्रपट सतत फ्लॉप का होतात यामागचे कारणही सलमाने उघडपणे सांगितले आहे.

हेही वाचा- Video : रविना टंडनच्या मुलीला विमानतळावर धक्काबुक्की; नाराजी व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

Emergency Box office collection day 19 Kangana Ranaut movie earned only 0.05 crore on Tuesday
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ने १९व्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई, अजूनपर्यंत बजेटचा आकडा ओलांडू शकला नाही चित्रपट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shahid Kapoor starr Deva box office collection day 2
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाच्या कमाईत वाढ, दोन दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला 
Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Premachi Goshta Fame swarda thigale aerial yoga in aata hou de dhingana season 3
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मुक्ताचं ‘हे’ कौशल्य पाहून चकित व्हाल, ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांचीही झाली हालत खराब
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…

चित्रपट का फ्लॉप होतात?

अवॉर्ड शोच्या पत्रकार परिषदेत फ्लॉप हिंदी चित्रपटांबद्दल बोलताना सलमान म्हणाला, ‘आजकाल चुकीचे चित्रपट बनवले जात आहेत. त्यामुळेच ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात. चित्रपट निर्मात्यांना वाटते की ते उत्तम चित्रपट बनवत आहेत, पण तसे नाही.हिंदी चित्रपट चालत नाहीत, हे मी खूप दिवसांपासून ऐकत आहे. वाईट चित्रपट बनवले तर कसे चालतील? प्रत्येकाला वाटते आपण ‘मुगल-ए-आझम’, ‘शोले’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया’ सारखे सुपरहिट चित्रपट बनवत आहोत. पण तसं नाहीये. कारण आजकाल असे काही दिग्दर्शक आहेत ज्यांना भारत फक्त कुलाबा ते अंधेरपर्यंतच असल्यासारखा वाटतो. पण तो भारत नाहीये. भारत हा रेल्वेस्टेशनच्या पलीकडून सुरु होतो. आजच्या दिग्दर्शकांना वाटते की ते मस्त पिक्चर काढतील. पण असे होताना दिसत नाही. असेही सलमान म्हणाला.

यावेळी सलमान खानने त्याच्या आगामी ‘किसी का भाई की जान’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले. सलमान म्हणाला ‘हा चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. तुम्ही सगळे चित्रपट बघायला जा. मोठ्या मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. ही क्लिप विसरू नका, नाहीतर नंतर तुम्ही म्हणाल तुम्ही किती बोलत होता आणि तुम्ही स्वतः कोणत्या प्रकारचा चित्रपट बनवला आहे. सलमानचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक जोरजोरात हसायला लागले.

हेही वाचा- “पप्पांना तुझा अभिमान वाटेल असं…” भावाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट, फोटोंनी वेधलं लक्ष

सलामानचा आगामी चित्रपट

सलमानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा निर्माता सलमान खान आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम आणि जस्सी गिलसारखे स्टार्स देखील आहेत. सलमान खान आणि पूजा हेगडे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सलमानचा ‘टायगर ३’ चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader