बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमान एका अवॉर्ड शोच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. पत्रकार परिषदेत दबंग खान मनमोकळेपणाने बोलला. बॉक्स ऑफिसवर चित्रपट सतत फ्लॉप का होतात यामागचे कारणही सलमाने उघडपणे सांगितले आहे.

हेही वाचा- Video : रविना टंडनच्या मुलीला विमानतळावर धक्काबुक्की; नाराजी व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

actor akshay kumar accounced his new upcoming movie bhoot bangala on his birthday
तब्बल १४ वर्षांनी अक्षय कुमार, प्रियदर्शन एकत्र करणार काम; अभिनेत्याच्या वाढदिवशी नवीन चित्रपटाची घोषणा, पोस्टर प्रदर्शित
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Rajinikanth, Rajinikanth will star in coolie movie, Nagarjuna Akkineni, nagarjuna, Sathyaraj, Shruti Haasan, Coolie movie,
सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
old bollywood gang of vasepur and marathi tumbad movie rerealse in theatre
‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटासह गाजलेले हिंदी सिनेमे पुन्हा थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित, वाचा यादी
kahaani, kahaani vidya balan, kahaani sujoy ghosh
फक्त आठ कोटी बजेट असलेल्या ‘या’ बॉलीवूड सिनेमाने कमावले १०४ कोटी; पटकावले तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अमिताभ बच्चन…
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

चित्रपट का फ्लॉप होतात?

अवॉर्ड शोच्या पत्रकार परिषदेत फ्लॉप हिंदी चित्रपटांबद्दल बोलताना सलमान म्हणाला, ‘आजकाल चुकीचे चित्रपट बनवले जात आहेत. त्यामुळेच ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात. चित्रपट निर्मात्यांना वाटते की ते उत्तम चित्रपट बनवत आहेत, पण तसे नाही.हिंदी चित्रपट चालत नाहीत, हे मी खूप दिवसांपासून ऐकत आहे. वाईट चित्रपट बनवले तर कसे चालतील? प्रत्येकाला वाटते आपण ‘मुगल-ए-आझम’, ‘शोले’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया’ सारखे सुपरहिट चित्रपट बनवत आहोत. पण तसं नाहीये. कारण आजकाल असे काही दिग्दर्शक आहेत ज्यांना भारत फक्त कुलाबा ते अंधेरपर्यंतच असल्यासारखा वाटतो. पण तो भारत नाहीये. भारत हा रेल्वेस्टेशनच्या पलीकडून सुरु होतो. आजच्या दिग्दर्शकांना वाटते की ते मस्त पिक्चर काढतील. पण असे होताना दिसत नाही. असेही सलमान म्हणाला.

यावेळी सलमान खानने त्याच्या आगामी ‘किसी का भाई की जान’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले. सलमान म्हणाला ‘हा चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. तुम्ही सगळे चित्रपट बघायला जा. मोठ्या मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. ही क्लिप विसरू नका, नाहीतर नंतर तुम्ही म्हणाल तुम्ही किती बोलत होता आणि तुम्ही स्वतः कोणत्या प्रकारचा चित्रपट बनवला आहे. सलमानचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक जोरजोरात हसायला लागले.

हेही वाचा- “पप्पांना तुझा अभिमान वाटेल असं…” भावाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट, फोटोंनी वेधलं लक्ष

सलामानचा आगामी चित्रपट

सलमानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा निर्माता सलमान खान आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम आणि जस्सी गिलसारखे स्टार्स देखील आहेत. सलमान खान आणि पूजा हेगडे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सलमानचा ‘टायगर ३’ चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.