बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट चांगली कमाई करत आहे. बहुतांश चित्रपट समीक्षकांनी सुद्धा कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र, दुसरीकडे सेन्सॉरने चित्रपटात काही बदल सुचवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : छोट्या पडद्यावर उलगडणार सिंधुताईं सपकाळ यांचा जीवनपट; किरण माने दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, म्हणाले…

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) अर्थात ​​सेन्सॉर बोर्डाने ‘सत्यप्रेम की कथा’च्या निर्मात्यांना चित्रपटात एकूण सात बदल करण्यास सांगितले आहेत. यामध्ये ‘घपा-घप’ या शब्दाचाही समावेश आहे. सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना हा शब्द म्यूट करण्यास सांगितले असून सर्वप्रथम संजय दत्तच्या ‘संजू’ बायोपिक सिनेमात ‘घपा-घप’ शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला होता. त्यामुळे सध्या नेटकरी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. “पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ चित्रपटात जो शब्द सेन्सॉर बोर्डाने ठेवला होता, तो ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटातून का वगळला जातोय?” असा प्रश्न काही युजर्सनी उपस्थित केला आहे. परंतु, नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटातून सुद्धा सेन्सॉर बोर्डाने ‘घपा-घप’ संवाद हटवला होता.

हेही वाचा : “ओंक्या तू गद्दार आहेस”, ओंकार भोजनेच्या नाराज चाहत्याला दिले नम्रता संभेरावने उत्तर; म्हणाली, “त्याच्या…”

सेन्सॉर बोर्डाने ‘गुज्जु पटाका’ या गाण्यातील चेलियां हा शब्द हटवून त्याऐवजी ‘राधे की सहेलियां’ आणि ‘एक शॉट’ऐवजी ‘एक बार’ असे शब्द वापरावे असे निर्मात्यांना सुचवले आहे. तसेच ‘डर्टी माइंड’ हा शब्द चित्रपटात म्यूट करण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटातून ‘फिनाइल’चे लेबल काढून टाकावे आणि शेवटी दिलेल्या बलात्काराच्या आकड्यांचा पुरावा सादर करण्यास सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना सांगितले होते. नमूद केलेल्या या बदलांनंतर ‘सत्यप्रेम की कथा’ला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात आले.

हेही वाचा : “तुझं घर स्वर्गासारखं आणि बायको…” सिद्धार्थ चांदेकरच्या लंडनमधील व्हिडीओवर मिताली मयेकरने केली भन्नाट कमेंट

दरम्यान, ‘भूल भुलैया २’ सुपरहिट झाल्यानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या जोडीला पुन्हा एकदा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई केली होती. ‘लव आज कल’ आणि ‘भूल भुलैया २’ नंतर कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’हा तिसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbfc asks satyaprem ki katha makers to remove controversial words from movie sva 00
Show comments