Dharmendra Birthday Speial : आज अभिनेते धर्मेंद्र यांचा ८७वा वाढदिवस. ६०च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये धर्मेंद्र यांचं नाव टॉपला होतं. त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. अनेक सुपरहिट चित्रपट धर्मेंद्र यांच्या नावे आहेत. परंतु तसं जरी असलं तरी त्यांना हिंदी सिनेसृष्टीत काम करताना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता. एक वेळ अशी आली होती की त्यांनी गावाला परत जाण्याचा निर्णय घेतला.

धर्मेंद्र हे मूळचे पंजाबचे. तिथून ते मुंबईत नशीब आजमावण्यासाठी आले. तेव्हा त्यांची भेट मनोज कुमार यांच्याशी झाली. दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. एका मीडिया रीपोर्टनुसार, ज्या चित्रपटासाठी धर्मेंद्र पंजाबहून मुंबईत आले, तो चित्रपट कधीच तयार होऊ शकला नाही. यादरम्यान त्यांना बऱ्याच कठीण काळातून जावं लागलं. तेव्हा त्यांना काहीच काम मिळालं नाही. त्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करणंही कठीण जाऊ लागलं. अखेर त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला.

Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
second phase of action against unauthorized buildings at Agrawal Nagar in Nalasopara also underway on Monday
नालासोपार्‍यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई, स्थानिकांच्या रोषाचा खासदार, आमदारांना फटका
upsc training center loksatta news
जिल्हास्तरावर यूपीएससी, एमपीएससीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार? सुधारणा समितीसमोर…
landslide in left main canal of Tilari Dam
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड; त्यामुळे रस्ता, शेती, बागायतीमध्ये पाणी
Chandrakant Patil will be responsible for party expansion in Sangli
सांगलीत पक्ष विस्ताराची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर
Pune BJP leadership to be taken over by Muralidhar Mohol instead of chandrakant patil
पुण्याचे भाजपचे नेतृत्व मुरलीधर मोहोळ यांच्याकडे

आणखी वाचा : “अरे काय हे..!”, आमिर खानला पाहून चाहते निराश

एक दिवस निराश होऊन धर्मेंद्र स्टेशनवर पोहोचले आणि ट्रेनमध्ये बसले. ही गोष्ट मनोज कुमार यांना समजली. त्यांनी लगेच स्टेशन गाठलं आणि धर्मेंद्रला ट्रेनमधून उतरवलं. त्यांनी धर्मेंद्र यांची समजूत काढली. त्यांना लवकरच काम मिळेल अशी आशा दाखवली.

हेही वाचा : वडिलांना देव मानणारा सनी देओल सावत्र बहिणीचं तोंडही पाहणं पसंत करत नाही, कारण…

१९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आता अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारत गेली अनेक वर्ष ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

Story img Loader