करीना कपूर-खान आणि शाहिद कपूर यांचा २००७ साली प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. अजूनही प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटासाठी एक खास जागा आहे. चाहत्यांनी अनेकदा चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची बातमी समोर आली होती.

हेही वाचा- Video: “मला भीती वाटत आहे…,” श्रद्धा कपूरने मराठी बोलत व्यक्त केली काळजी, अभिनेत्रीच्या साधेपणाने वेधलं लक्ष

vicky kaushal and akshaye khanna refused to interact during chhaava film
‘छावा’च्या शूटिंगवेळी विकी कौशल-अक्षय खन्नाला एकमेकांचे चेहरेही पाहायचे नव्हते, सेटवर दोघे अजिबात बोलले नाहीत, काय आहे कारण?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Saif Ali Khan attack case Mental health Titwala suspect
Video : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पकडलेल्या टिटवाळ्यातील संशयित तरूणाच्या मनावर परिणाम? कुटुंबीयांची खंत
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…

मिळालेल्या माहितीनुसार ‘जब वी मेट’च्या सिक्वेलवर लवकरच काम सुरू होणार आहे. पहिला भाग दिग्दर्शित करणारे इम्तियाज अलीच या दुसऱ्या भागाचेही दिग्दर्शन करणार आहेत. ‘जब वी मेट २’साठी शाहिद कपूर व करीना कपूर यांनी होकार दिला असल्याचे सांगण्यात आले होते. या चर्चांवर आता इम्तियाज अली यांनी मौन सोडत चित्रपटाच्या सिक्वेलबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा- “कोणाबरोबरही झोपायला जबरदस्ती…”, नीना गुप्ता यांनी कास्टिंग काउचबद्दल केलेले विधान

नुकत्याच एका मुलाखतीत इम्तियाज अली यांनी ‘जब वी मेट’च्या सिक्वेलबाबत भाष्य केले आहे. इम्तियाज अली म्हणाले, “माझ्याकडे आतापर्यंत ‘जब वी मेट २’बाबत कोणतीही कथा आलेली नाही. मी या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अनेक बातम्या वाचल्या आहेत. या बातम्या छापण्याअगोदर कुणी मला विचारलेही नाही. याबाबत मी काय बोलू मला खरंच कळत नाहीये.”

हेही वाचा- हृतिक रोशनला डेट केल्यानंतर सबा आझादला करावा लागलेला तिरस्काराचा सामना; अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली, “अनेकदा मनात विचार येतो…”

याच वर्षी ‘जब वी मेट’ काही चित्रपटगृहांत पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात शाहिद कपूरने साकारलेले ‘आदित्य’ आणि करीना कपूरने साकारलेले ‘गीत’ ही पात्रे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. आजही प्रेक्षकांच्या मनात शाहिद व करीनाच्या या ‘जब वी मेट’ची जागा कोणताही चित्रपट घेऊ शकलेला नाही. त्यामुळे याच्या सिक्वेलसाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.

Story img Loader