शाहरुख खानचा ‘जवान’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असून पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटात बऱ्याक गंभीर समस्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे. शेतकरी आत्महत्या, आरोग्य सुविधा, मतदानाचे महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटातून भाष्य केलं आहे. कदाचित आता यामुळेच या चित्रपटाला एक राजकीय वळण मिळालं आहे.

कित्येकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच बड्याबड्या कलाकारांनीही शाहरुखच्या स्टारडमचं अन् बॉक्स ऑफिसवर त्याने केलेल्या कमाईचं कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी याला राजकीय रंग द्यायला सुरुवात केली आहे.

Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Nitish Kumar On Manipur Politics
Manipur Politics : नितीश कुमार यांचा पक्ष मणिपूरमध्ये एनडीएमध्ये सहभागी असणार की नाही? संभ्रमाच्या परिस्थितीमुळे चर्चांना उधाण
Nitish Kumar JDU withdraws support from BJP
Nitish Kumar : नितीश कुमार यांचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ राज्यातील सरकारचा पाठिंबा काढला
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
guardianship of Washim district was given to Hasan Mushrif from 630 km away Kolhapur
वाशीम जिल्ह्याचे पालकत्व ६३० कि.मी.वर

आणखी वाचा : रेबेल स्टार प्रभासच्या नव्या चित्रपटाची घोषणा; ‘आदिपुरुष’नंतर अभिनेता साकारणार भगवान शंकराची भूमिका

यासगळ्यात कॉग्रेसचे माजी मंत्री जयराम रमेश यांनीही ‘जवान’चा आधार घेत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. मध्यंतरी ‘गदर २’ या चित्रपटाचं संसदेत २ दिवस स्क्रीनिंग केलं गेलं हाच मुद्दा घेऊन जयराम रमेश यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “काही दिवसांपूर्वी नव्या संसद भवनात ‘गदर २’चं स्क्रिनिंग ठेवलं होतं. आता मोदी सरकारमध्ये ‘जवान’चं स्क्रिनिंग संसदेत आयोजित करायची हिंमत आहे का?” असा रोखठोक प्रश्नच त्यांनी विचारला आहे.

शाहरुखने खूप वर्षांनी इतक्या उघडपणे एवढ्या गंभीर विषयांवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काहींनी त्याचं प्रचंड कौतुक केलं आहे तर काही लोक त्यावर आपल्या राजकरणाची पोळी भाजू पहात आहेत. ‘जवान’ सध्या बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे.

Story img Loader