ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र यांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता, पण ते लहान असतानाच कुटुंबाबरोबर मुंबईला आले होते. ते मुंबईतील गिरगाव परिसरात राहत होते. त्यांचे पहिले घर आताच्या राजा राममोहन रॉय मार्गावर होते. त्या चाळीत त्यांची लहानशी खोली होती. जितेंद्र यांनी आता गिरगावातील जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.

३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”

bachchu kadu on ajit pawar faction mla
Bachchu Kadu : “अजित पवार गटाचे अर्ध्याहून अधिक आमदार…”; प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
gadchiroli dead bodies of children
गडचिरोली : चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट…
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Buldhana, Husband Sentenced 3 Years, wife Self Immolation, Alcoholic, Harassment, Domestic Violence, Court Verdict, Chikhli Taluka, Kinhola,
बुलढाणा: पत्नीला न वाचवता झोपी गेलेल्या पतीला तीन वर्षांची शिक्षा
Pimpri chinchwad, sexual assault, 14 year old girl, 14 Year Old Girl assault in Pimpri, Ravet Police station, Damini squad, arrest,
आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे
Two years rigorous imprisonment for astrologers who claim to have a child
भंडारा : अपत्य प्राप्तीचा दावा करणे ज्योतिषांना भोवले!

आयुष्याची १९ वर्षे त्यांनी गिरगावातील घरात घालवली. “ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. तेव्हा लहान लहान गोष्टीत आनंद वाटायचा, त्या मैत्रीत आनंद होता. तेव्हा जवळ काहीच नव्हतं, पण खूप काही असल्याचं समाधान होतं. आय़ुष्यातील सुरुवातीचे १९ वर्षे मिळालेलं समाधान आणि आनंद आयुष्यात परत कधीच नाही मिळाला,” असं जितेंद्र म्हणाले.

“ते आधीच रस्त्यावर आले आहेत”, तनुश्री दत्ता नाना पाटेकरांचा एकेरी उल्लेख करत म्हणाली, “त्यांची लायकी…”

“मी गेल्या ३० वर्षांपासून ज्या राहतोय, त्या घराच्या शेजारी कोण राहतं, हे मला अजूनपर्यंत माहीत नाही. गिरगावात राहत असताना माझ्या घरात ट्युबलाइट आणि पंखा लावला, त्यावेळी इंग्रजी ब्रँडचा पंखा म्हणजे मोठी गोष्ट होती. तो फॅन बघायला सगळे घरी आले होते. त्याकाळी लोकांना कौतुक होतं. आमचं घर पाहायला आलेत म्हणून आम्हीही रुबाबात उभे असायचो. तेव्हा कुठल्याही गोष्टींची कमतरता जाणवलीच नाही, कारण जे नसायचं ते शेजाऱ्यांकडून घेता यायचं नंतर परत करायचो,” असं जितेंद्र ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

“मी गिरगावं सोडलं तेव्हा १९ वर्षांचा होतो. तिथून आम्ही कुलाब्याला राहायला गेलो होतो. गिरगावातील खोली विकली होती, त्या खोलीचे वडिलांना ३-४ हजार रुपये मिळाले. त्यानंतर कुलाब्यात ७-८ हजारात आम्ही लहान फ्लॅट घेतला. खोली १२० चौरसफुटांची होती, तर फ्लॅट ४५० चौरसफुटांचा होता. माझी आई ते घर पाहून मला म्हणाली, ‘अरे रवी हे तर क्रिकेटचं मैदान झालं.’ तेव्हा त्या लहान लहान गोष्टीत आनंद मिळायचा, गरजा कमी होत्या,” अशा आठवणी जितेंद्र यांनी सांगितल्या.