बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रदर्शित होऊन १५ ते २० वर्षे उलटली असली तरी आजही चाहते ते तितक्यात उत्सुकतेने पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. करण जोहरच्या या चित्रपटातील तिन्ही पात्रे विशेष गाजली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आता या चित्रपटातील अभिनेत्री काजोलने एक खुलासा केला आहे.

काजोलने नुकतंच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरसह खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले. यावेळी ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी तिला या चित्रपटातील शेवटच्या दृश्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने फारच मजेशीर उत्तर दिले.
आणखी वाचा : “काजोलमुळे…” तब्बल २५ वर्षांनी ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाबद्दल रवीना टंडन स्पष्टच बोलली

Radhika Apte Movies on OTT (1)
मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलीवूड चित्रपटांमध्ये केल्यात बोल्ड भूमिका, कुटुंबासह पाहता येणार नाहीत तिचे OTT वरील ‘हे’ सिनेमे
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
actor akshay kumar accounced his new upcoming movie bhoot bangala on his birthday
तब्बल १४ वर्षांनी अक्षय कुमार, प्रियदर्शन एकत्र करणार काम; अभिनेत्याच्या वाढदिवशी नवीन चित्रपटाची घोषणा, पोस्टर प्रदर्शित
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
old bollywood gang of vasepur and marathi tumbad movie rerealse in theatre
‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटासह गाजलेले हिंदी सिनेमे पुन्हा थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित, वाचा यादी
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

जर अंजलीची व्यक्तिरेखा तुझ्या म्हणण्यानुसार पुढे गेली असती, तर तू शेवटी सलमान आणि शाहरुख यांच्यात कोणाची निवड केली असतीस? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “माझ्या मते जर अंजलीचे पात्र असते तर तिने कधीच साडी नेसली नसती. ती कॉलेजमध्ये असताना नेहमी ट्रॅक पँट घालायची आणि त्यात ती सुंदर दिसायची. त्यावेळी ती महागडे शूज वापरायची.”

“जर स्क्रिप्ट माझ्यानुसार पुढे गेली असती, तर मी शेवटी सलमान खानने साकारलेले अमन या पात्राची निवड केली असती. मी राहुल म्हणजेच शाहरुख खानबरोबर कधीही गेले नसते. पण चित्रपट पाहिला तर अंजलीच्या पात्राला राहुलबरोबर जाण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. म्हणूनच ते घडले”, असे काजोलने सांगितले.

दरम्यान ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तिला या चित्रपटाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवले होते. या चित्रपटातील गाणी, डायलॉग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते.