बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’यासारखे अनेक हिट चित्रपट दिले. त्याशिवाय त्याचा कॉफी विथ करण हा शो देखील चांगलाच गाजला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र आता करण जोहरने एक मोठा निर्णय घेतला आहे. करण जोहर याने नुकतंच ट्विटरला रामराम केला आहे.

करण जोहरने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने करण जोहरने ट्विटर सोडल्याची घोषणा केली. सततच्या नकारात्मक गोष्टीला कंटाळून त्याने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे. याबाबत ट्वीट करत तो म्हणाला, “अधिक सकारात्मक उर्जेसाठी स्थान बनवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. गुडबाय ट्वीटर.”

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

karan johar

या ट्वीटवरही लोकांनी करण जोहरबद्दल बरेच काही ऐकले आहे. एका युजरने कमेंट करत म्हणाली, सर, तुम्हाला संपूर्ण भारतात शांतता आणि आनंद हवा असेल तर इंटरनेट कॉफी विथ करणबद्दल असलेला कचराही हटवा. तर आणखी एक युजर म्हणाला, तुम्हाला कोणीही मिस करणार नाही. आणखी एका ट्वीटर युजरने म्हटले की शाहरुखशिवाय तुम्हाला कोणीही मिस करणार नाही.

आणखी वाचा : “यहां कौन विक्रम कौन वेधा?” पतीचा फोटो शेअर करत हेमांगी कवीने विचारला प्रश्न

करण जोहर हा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत आले होते. यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरुन त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेक सोशल मीडिया युजर्स त्याच्याविरोधात संतापले होते. अनेकांनी याप्रकरणानंतर त्याला वाईटरित्या ट्रोल करण्यात सुरुवात केली होती. तसेच त्याच्यावर घराणेशाहीचा आरोपही करण्यात आला होता.