अभिनेत्री सारा अली खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने करण जोहरच्या कॉफी विथ करण कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने कार्तिक आर्यनबरोबरच्या ब्रेकअपवर भाष्य केले होते. आता कार्तिक आर्यनने सारा अली खानच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- सिद्धार्थ मल्होत्रा पत्नी कियारा अडवाणीला ‘या’ नावांनी मारतो हाक; ‘कॉफी विथ करण’मध्ये अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला…

Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिकने सारा अली खानने ब्रेकअपबाबत केलेल्या भाष्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिक म्हणाला, “जर दोन व्यक्तींमध्ये एखादं नातं असेल, तर दुसऱ्या व्यक्तीनं त्या नात्याबद्दल भाष्य करू नये. प्रत्येकानं आपल्या नात्याचा मान ठेवला पाहिजे. मी माझ्या नात्याबद्दल कधीही काहीही बोलत नाही. त्यामुळे समोरच्याकडूनही मी तशीच अपेक्षा ठेवतो. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र असतात तेव्हा दोघांनी त्या वेळच्या नात्याचा मान ठेवला पाहिजे. त्याचबरोबर स्वत:चाही मान ठेवला पाहिजे.”

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझनच्या तिसऱ्या भागात अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडेने हजेरी लावली होती. या क्रार्यक्रमात साराने कार्तिक आर्यनबरोबरच्या ब्रेकअपवर भाष्य केले होते. सारा म्हणालेली, “माझ्यासाठी हे सोपं नव्हतं. जेव्हा माझं एखाद्याबरोबर नातं तयार होतं; मग ती मैत्री असो, व्यावसायिकरीत्या असो किंवा प्रेमाची; तेव्हा मी स्वत:ला त्या नात्यात पूर्णपणे गुंतवून घेते. आजची परिस्थिती आणि उद्याची परिस्थिती वेगळी असू शकते. पण, एकाच क्षेत्रात राहून एकमेकांबरोबर बोलायचं नाही किंवा एकमेकांसमोर कधीच यायचं नाही, असं नाही होऊ शकत.”

हेही वाचा- “मी आईला स्क्रीनवर पाहतो तेव्हा…” मिथुन चक्रवर्ती यांचा सुपुत्र नमाशीचे आई योगिता बालीबद्दलचे विधान चर्चेत

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच त्याचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याच्यबरोबर कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. आता तो चंदू चॅम्पियन चित्रपटा झळकणार आहे. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच कार्तिक ‘कॅप्टन इंडिया’ आणि ‘भूल भुलैय्या ३’ मध्येही दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader