ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरुनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून याचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याचसंदर्भात नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच ‘लल्लनटॉप’च्या ‘सिनेमा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. याच मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘A Wednesday’ चित्रपटाचा एक किस्सा सांगितला.

suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
tharla tar mag arjun will married to sayali reveals chaitanya
अर्जुनचं लग्न सायलीशीच होणार! ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याने सांगितला मालिकेतील पुढचा ट्विस्ट, काय आहे योजना?
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
Maharashtrachi Hasya Jatra nikki tamboli
“मी कोकणात शिमग्याला जातेय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये भन्नाट स्किट सादर करणार निक्की तांबोळी, समोर आला प्रोमो
Chhava controversy
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘छावा’ चित्रपटातली ती दृश्यं का कापली जाणार?
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?

आणखी वाचा : “त्यांना सरकारकडून…” ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह ट्रोलर्सबद्दल स्पष्टच बोलले, पंतप्रधानांचाही केला उल्लेख

नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘A wednesday’ हा चित्रपट चांगलाच गाजला. वाढत्या दहशतवादामुळे यंत्रणेवर भडकलेल्या एका सामान्य माणसाने गोष्टी आपल्या हातात घेतल्या तर काय होऊ शकतं हे या चित्रपटातून फार प्रभावीपणे दाखवण्यात आलं होतं. यामध्ये चार दहशतवादी दाखवण्यात आले होते. ते चारची दहशतवादी मुस्लिम असल्याचं नसीरुद्दीन शाह यांनी दिग्दर्शक नीरज पांडेच्या निदर्शनास आणून दिले होते.

याविषयी नाराजी व्यक्त करताना नसीरुद्दीन शाह या मुलाखतीमध्ये म्हणाले, “मी ही गोष्ट नीरजच्या लक्षात आणून दिली होती. या चारही आतंकवाद्यांमध्ये एकही तमिलियन रेबेल, नक्षली किंवा माओवादी नव्हता. चौघेही मुस्लिम होते. मी जेव्हा नीरजला विचारलं की हे जाणून बुजून केलं आहे का? तर त्यावर तो म्हणाला की असं काहीच नाही यात कोणताही राजकीय अॅंगल नाही.”

Story img Loader