ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरुनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून याचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याचसंदर्भात नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच ‘लल्लनटॉप’च्या ‘सिनेमा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. याच मुलाखतीत बॉलिवूड अभिनेते राजकीय मत उघडपणे का मांडत नाही? असा प्रश्न नसीरुद्दीन शाह यांना विचारण्यात आला.

Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा
President Draupadi Murmu
President Draupadi Murmu: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून भारतीय क्रीडापटूंचे कौतुक, डी. गुकेशचा खास उल्लेख
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
BJP MP Jagdambika Pal
Waqf Board Bill : ‘अध्यक्ष फोनवर कोणाशी तरी बोलले आणि…’, निलंबित वक्फ संयुक्त संसदीय समितीच्या सदस्यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

आणखी वाचा : “मुस्लिमांचा द्वेष ही फॅशनच…” नसीरुद्दीन शाह यांचं सत्ताधारी पक्षाबद्दल मोठं वक्तव्य

या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, “मला वाटतं याबाबतीत त्यांना खूप असुरक्षित वाटत असावं, ज्याप्रकारे राजकीय मत मांडणाऱ्या अभिनेत्याचा छळ होतो, शिव्यांनी भरलेली पत्रं, कॉमेंट येतात ते पाहता त्यांना स्वतःच्या करिअरची चिंता वाटत असावी. मी या अशा कॉमेंट एका कानाने ऐकतो दुसऱ्या कानाने सोडून देतो, कारण माझ्यालेखी त्यांचं काहीच महत्व नाही. हे सगळे भाडोत्री लोक आहेत, सरकारकडून या लोकांना इतरांना ट्रोल करण्याचे, शिव्या घालायचे पैसे मिळतात. त्यामुळे मी यांना इतकं महत्त्व देत नाही.”

पुढे नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मी यांचं का ऐकून घेऊ, उद्या समजा पंतप्रधान माझ्याविषयी काही दोन चार शब्द बोलले तर मी ते काळजीपूर्वक ऐकून घेईन, पण ते तरी माझ्याविषयी का बोलतील?” नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या अशाच स्पष्टवक्तेपणामुळे आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरुन होणाऱ्या राजकारणाबद्दलही टिप्पणी केली होती.

Story img Loader