पंकज त्रिपाठी लवकरच अटल बिहारी वाजपेयींचा बायोपिक ‘मैं अटल हूं’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. यावेळी त्यांनी एक जुना किस्सा सांगितला. पंकज म्हणाले की त्यांचा राजकारणाकडे कल होता, परंतु एक घटना घडली, ज्यानंतर ते निराश झाले आणि राजकारणाचा विचार त्यांनी डोक्यातून काढून टाकला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पंकज बिहारमधील त्यांच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल बोलत होते. तेव्हा ते एबीव्हीपीचा एक भाग होते. “बिहारमध्ये प्रत्येकजण राजकारणी आहे,” असं ते यावेळी म्हणाले.

तुम्ही कधी राजकारणात येण्याचा विचार केला होता का? असं विचारल्यावर पंकज यांनी एक किस्सा सांगितला. त्यांचा राजकारणात यायचा विचार होता, पण एकदा अटक त्यांनी हा विचार सोडून दिला. “त्यावेळी मी राजकारणात येण्याचा विचार केला नव्हता. असं वाटत होतं की मी राजकारणात पुढे जाऊ शकेन पण नंतर अटक झाली आणि पोलिसांनी मला मारहाण केली म्हणून मी तो विचार तिथेच सोडून दिला,” असं पंकज त्रिपाठी ‘एएनआय’शी बोलताना म्हणाले.

Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया काय काम करतो? २७ व्या वर्षी ‘इतक्या’ कोटींचा मालक आहे माजी मुख्यमंत्र्यांचा नातू

पंकज त्रिपाठी म्हणाले की त्याच काळात त्यांना रंगभूमीची आवड निर्माण झाली आणि त्या मार्गावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला. “माझ्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर मला रंगभूमीची आवड निर्माण होऊ लागली होती आणि त्यामुळे मी या क्षेत्राकडे जास्त आकर्षित झालो,” असं त्यांनी सांगितलं.

Video: सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न करून परदेशात थाटला संसार, अभिनेत्रीने गृहप्रवेश करत दाखवली नव्या घराची झलक

‘पीटीआय’ला २०१९ मध्ये दिलेल्या मुलाखतीत पंकज यांनी सांगितलं होतं की त्यांनी पाटणा येथील बेउर तुरुंगात एक आठवडा घालवला होता आणि त्या अनुभवाने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. “तुम्हाला तुरुंगात काही करायचं नसतं. मीटिंग नाही, स्वयंपाक नाही, काहीही नाही. तुम्ही पूर्णपणे एकटे असता. जेव्हा माणूस अत्यंत एकाकी असतो तेव्हा तो स्वतःला शोधू लागतो. त्या सात दिवसांत मी स्वतःला भेटलो. जेव्हा मी हिंदी साहित्य वाचायला सुरुवात केली तेव्हा मला जाणवलं की मी या जगापासून किती अलिप्त होतो. त्यानंतर माझ्यात पूर्णपणे बदल झाला,” असं पंकज म्हणाले होते.

Story img Loader