प्रसिद्ध नाटककार व अभिनेते पीयूष मिश्रा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासाठी ओखळले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याबरोबरच ते गीतकार व संगीतकारही आहेत, तसेच ते कविता व शायरीही लिहितात. शिवाय पीयूष यांचे लाईव्ह शोजसुद्धा चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. अभिनयाबरोबरच पीयूष हे त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी ‘साहित्य आजतक २०२३’च्या मंचावर हजेरी लावली अन् स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले.

पीयूष यांना सर्वप्रथम सलमानच्या ‘मैने प्यार कीया’ या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. परंतु त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला अन् हा चित्रपट सलमान खानकडे आला. यानंतर मनोरंजनविश्वात पीयूष यांना स्वतःची ओळख निर्माण करायला एक दशक वाट पहावी लागली. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पीयूष यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. आपल्या पत्नीसमोर त्यांनी जेव्हा त्यांची गुपितं उलगडली तेव्हा नेमकी त्यांची मनस्थिति कशी होती याविषयी भाष्य केलं आहे.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
Kashmiri youth arrested for cheating young women with the lure of marriage Pune news
विवाहाच्या आमिषाने तरुणींची फसवणूक करणारा काश्मिरी तरुण गजाआड; दिल्ली, फरिदाबाद, भोपाळ, इंदूरमध्ये फसवणुकीचे गुन्हे
kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”

आणखी वाचा : “जेव्हा पुरुष गरोदर…” स्त्री-पुरुष समानतेबद्दल अन् ‘फेमीनिजम’बद्दल नीना गुप्तांनी केलं परखड भाष्य

पीयूष यांच्या लग्नानंतरही बऱ्याच गर्लफ्रेंड्स होत्या अन् त्यावेळी त्यांची जीवनशैलीही फारशी चांगली नव्हती. याबरोबरच घर चालवण्यातही पीयूष यांचा काहीच सहभाग नसायचा. त्यावेळी त्यांना कुणीतरी असा सल्ला दिला की आपल्या पत्नीसमोर त्यांनी सगळ्या गोष्टी कबूल करायला पाहिजेत अन् सगळं खरं सांगायला पाहिजे.एकेदिवशी पीयूष यांनी आपल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली द्यायचा निर्णय घेतला अन् एका संध्याकाळी पीयूष यांनी त्यांच्या पत्नीसमोर घडाघडा आपलं मन मोकळं केलं.

आपल्या जीवनात त्यांनी केलेल्या चुका त्यांनी कबूल केल्या, इतकंच नव्हे तर लग्नानंतरही कोणत्या कोणत्या स्त्रीबरोबर त्यांचे संबंध होते हेदेखील पीयूष यांनी आपल्या पत्नीसमोर कबूल केलं. याबद्दल पीयूष म्हणाले, “त्या रात्री मला वाटलं की आज माझा घटस्फोट नक्की होणार, माझी पत्नी म्हणाली की मी केलेल्या या चुका ऐकून तिला फार वाईट वाटलं आहे, परंतु मी हे सगळं अत्यंत प्रामाणिकपणे कबूल केल्याने ती खुश होती अन् तिने आलिंगन देत माझ्या या कृतीचं स्वागत केलं.” आयुष्यात कोणतीही चूक केली तर त्याची कबुली तातडीने द्यायला हवी ज्याने तुमचं मन हलकं होतं हा संदेश पीयूष यांनी त्यांच्या या मुलाखतीमध्ये तरूणांना दिला आहे.

Story img Loader