सुदीप्तो सेनचा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असून, या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. बॉलीवूडमधील सर्व कलाकार याला पाठिंबा देत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाच्या कथेवरून राजकारणही सुरू झाले आहे. चित्रपटाच्या कथेवर अनेक राजकीय पक्ष आक्षेप घेत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका केली आहे.

हेही वाचा- ” गेल्या वर्षापासून मी…”; मुलीचे भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची झाली होती ‘अशी’ अवस्था

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
pm narendra modi at maha kumbh
पंतप्रधानांचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नान; महाराष्ट्र ते दिल्ली! मतदानाच्या दिवशीच मोदी काय काय करतात?
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Uday Samant on chhava movie
Chhava Movie Controversy : अखेर छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…
Chhaava Trailer Outrage Uday Samant
Chhaava Movie Trailer: “..तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत सरकारची स्पष्ट भूमिका; उदय सामंत म्हणाले…

मीडियाशी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, “जे पक्ष चित्रपटाला विरोध करीत आहेत ते दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे आहेत. मी स्वत: एक आई असल्याने हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते. जे राजकीय पक्ष आपल्या देशातील नागरिकांवर होणारे अत्याचार विसरतात, ते दहशतवादी कारस्थानांच्या पाठीशी उभे आहेत, असे मानले जाऊ शकते,ठ असे स्मृती इराणी म्हणाल्या.

हेही वाचा- विवेक अग्निहोत्री यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस; दिग्दर्शक ट्वीट करीत म्हणाले…

द केरला स्टोरी’ चित्रपट विरोधानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास १२ कोटी रुपये कमावले होते. पाच दिवसांत चित्रपटाने ५६. ७२ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत हा चित्रपट अजून चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Story img Loader