‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ कालपासून (३० मार्चपासून) नेटफ्लिक्सवर सुरू झाला. पहिल्याच शोला रणबीर कपूर, नीतू कपूर व रिद्धिमा कपूर साहनी यांनी हजेरी लावली. शोदरम्यान तिघांनी कपूर कुटुंबाबतचे अनेक किस्से सांगितले. रणबीरने वडील व दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आठवण काढली आणि त्यांच्याबद्दलचा एक खास किस्सा सांगितला; ज्यात रणबीरनं ऋषी कपूर यांचा खूप मार खाल्ला होता.

शोदरम्यान रणबीरनं सांगितलं की, आजपर्यंत ऋषी कपूर यांनी त्याच्यावर एकदाच हात उचलला आहे. रणबीर म्हणाला, “बाबा खूप धार्मिक होते. आर. के. स्टुडिओजमध्ये तेव्हा दिवाळीची पूजा होती. तेव्हा कदाचित मी आठ-नऊ वर्षांचा होतो आणि मी चप्पल घालून मंदिरात गेलो होतो. तेव्हा मी वडिलांचा खूप मार खाल्ला होता.”

Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Ishita Raj Confesses Love For Hardik Pandya in Interview After His Divorce with Wife
Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”
pune married women suicide with her daughter
पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेची मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या,पतीला दहा वर्षे सक्तमजूरी
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
sanjay shirsat replied to uddhav thackeray
Sanjay Shirsat : “…तर मुख्यमंत्रीही विकृत आहेत”, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसच्या मांडीवर बसून…”
Dharmendra
जावेद अख्तर यांच्याशी ‘तसं’ वागण्याचा धर्मेंद्र यांना आजही पश्चात्ताप; म्हणाले, “मला आश्चर्य वाटते…”
Ajit Pawars reaction on family planning
अजित पवार असे का म्हणाले, देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते…

तर, नीतू कपूर यांनी दोन्ही मुलं रणबीर आणि रिद्धिमाचं कौतुक केलं. नीतू कपूर म्हणाल्या, “माझी दोन्ही मुलं खूप चांगली आहेत. दोघांनी कधीच कोणाशी मोठ्या आवाजात संभाषण केलं नाही. माझ्या मुलांवर खूप चांगले संस्कार झाले आहेत; जे ऋषीजी यांनी त्यांना दिले दिले आहेत. त्यांनी दोघांना वेळेचं महत्त्व शिकवलं. माणसांची आणि पैशाची किंमत करायला शिकवली.”

हेही वाचा… आलिया भट्टने ‘क्रू’ चित्रपटातील अभिनेत्रींचे केले कौतुक; म्हणाली…

दरम्यान, रणबीरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ या आगामी चित्रपटात रणबीर झळकणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ ला ख्रिसमसदरम्यान प्रदर्शित होणार आहे. तसेच आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा एकत्र ‘ब्रह्मास्त्र-२’मध्ये झळकणार आहेत.