बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, कधी त्यांचे चित्रपट, तर कधी त्यांची वक्तव्ये यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता रणबीर कपूर( Ranbir Kapoor) ने मानसिक आरोग्यावर वक्तव्य केल्याने तो चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूरने निखिल कामथच्या यूट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने त्याच्या अनेक खासगी गोष्टींबाबत वक्तव्य केले आहे. आई-वडिलांची भांडणे, बहिणीबरोबरचे नाते, मुलगी राहाच्या जन्मानंतर बदललेले त्याचे आयुष्य, दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केल्यानंतर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवतो, अशी मिळालेली ओळख, लग्नानंतर आलियाने त्याच्यासाठी तिच्यामध्ये केलेले बदल या सगळ्यांबरोबरच अभिनेत्याने मानसिक आरोग्याविषयीदेखील वक्तव्य केले आहे.

Khushi Kapoor
“माझा आत्मविश्वास…”, खुशी कपूरची तिच्या सौंदर्यावरून उडवली जात होती खिल्ली; किस्सा सांगत म्हणाली…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
Sanjay Mone
“आमचे मोने बाबा…”, मयुरी देशमुख ज्येष्ठ अभिनेते संजय मोनेंबाबत म्हणाली, “मोठ्या लोकांचा मोठेपणा…”

काय म्हणाला रणबीर?

रणबीरने निखिल कामथबरोबर बोलताना म्हटले, “माझे वडील आजारी पडण्याआधी मी मानसोपचार घेतले होते; पण त्याचा मला उपयोग झाला नाही. याचे पहिले कारण म्हणजे त्या तज्ज्ञांसमोर मी पूर्णपणे व्यक्त होत नसे आणि दुसरे असे की, मानसोपचार तज्ज्ञ मला एक प्रकारे आयुष्य कसे हाताळायचे हे मला शिकवत होते. मला वाटते की, काही गोष्टी तुम्ही स्वत:च शिकू शकता. माझे तज्ज्ञ जे काही मला सांगत होते, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, मला माझ्या आयुष्यातून काही गोष्टींपासून पळ काढायचा नाही. मला माझ्या काही भावना यासाठी बाजूला सारायच्या नाहीत की त्यामुळे मला शांती मिळते.”

हेही वाचा: Video: धनंजय पोवारचा इरिनाबरोबर ‘भूतानी पछाडलं’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “कल्याणी वहिनी दादाकडे लक्ष द्या…”

मानसिक आरोग्याबाबतच्या समस्या हाताळणे गरजेचे असल्याचे सांगताना रणबीरने म्हटले आहे की, अनेक जण अशा परिस्थितीचा फायदा घेतात आणि आपल्या जबाबदाऱ्या टाळतात. पण, मला वाटते की, मानसिक आरोग्य अशी गोष्ट आहे; जी शांतपणे व आकर्षक पद्धतीने हाताळली जाऊ शकते. गोष्टी न करण्यासाठी हे निमित्त म्हणून वापरू नका. ही समस्या आहे, त्यावर उपाय शोधा आणि त्यावर काम करीत राहा, असे त्याने म्हटले आहे.

जे पुरुष सहज दुखावले जाऊ शकतात, त्यांना सहजपणे ते सांगता येत नाही. त्याबाबत त्याने म्हटले की, तुम्ही मोकळेपणाने त्या संदर्भात बोलू शकत नाही. कारण- अनेक जण तुम्हाला स्त्रीवादीविरोधी म्हणण्याची शक्यता असते; पण पुरुष असो वा स्त्री, ज्यांना आपण मानसिकदृष्ट्या ठीक नाही, असे वाटते, त्यांनी मदत घेतली पाहिजे. मदत घेण्यात वा रडण्यात कोणत्याही प्रकारची लाज नाही आणि जे लोक तुमच्यावर प्रेम करतात, ते तुम्हाला समजून घेतात.

रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’मध्ये दिसणार आहे.

Story img Loader