अभिनेता रणदीप हुडाने ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल २६ किलो वजन कमी केलं होतं. शूटिंग संपेपर्यंत ४ महिने तो फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध प्यायचा, असा दावा चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी केला होता. पण या दाव्यामागचं सत्य आता रणदीपने स्वतःच सांगितलं आहे.

“त्याला अभिनयाचा अ देखील येत नाही आणि तो…”, ‘गदर २’ चा ट्रेलर पाहून अभिनेत्याने उडवली खिल्ली

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”

‘आज तक’शी बोलताना रणदीप म्हणाला, “ती बातमी खोटी आहे. मला तुमच्या मार्फत योग्य माहिती द्यायची होती. अनेकांना वजन कमी करण्याची घाई असते. मला भीती वाटते की अशा बातम्या वाचून लोक तसंच करू लागतील. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी दूध आणि खजूरच्या डाएटवर नव्हतो. हे खूप धोकादायक आहे, यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. हे अजिबात फॉलो करू नका.”

Video: केसात गजरा अन् लाल रंगाची साडी नेसून ट्रॅफिक सिग्नलवर मागतोय पैसे, ‘या’ अभिनेत्याला ओळखलंत का?

रणदीप पुढे म्हणाला, “मी या भूमिकेसाठी २६ किलो वजन कमी केलं होतं हे खरं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सामान्य लोकांना इतके वजन कमी करण्याची गरज नाही. आमच्यासारख्या अभिनेत्यांना अशी तयारी करावी लागते. माझ्याबाबतीत असंही झालं होतं की, माझा जो चित्रपट तीन-चार महिन्यांत तयार व्हायला हवा होता, तो बनायला एक वर्षाहून अधिक कालावधी लागला. या चित्रपटाच्या प्रदीर्घ शेड्यूलमुळे मला जवळपास ७ महिने कमी वजनात राहावे लागले. त्या काळात माझे वजन ६२ किलो असेल. एवढ्या कमी वजनामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रिकव्हरीत अडचणी येत आहेत. शिवाय सांधेदुखी आणि पचनाच्या समस्या होऊ लागल्या. त्यामुळे अशा डाएटचा सल्ला मी कुणालाही देणार नाही.”

“भारत-पाकिस्तानमधील द्वेषाचं कारण…”, गदर २ च्या ट्रेलर लाँचवेळी सनी देओलचे वक्तव्य

रणदीप पुढे म्हणाला, “मी वेगवेगळे डाएट फॉलो केले. माझी बहीण डॉ. अंजली हुड्डा इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट आहे. ती मला डाएटबद्दल सल्ला देत असते. तिचा सल्ला घेऊनही मला इतका त्रास सहन करावा लागला. मी तज्ज्ञांनी सुचवलेले व्यायाम आणि डाएट फॉलो केले. त्यामुळे तुम्ही कोणत्याही तज्ज्ञाच्या मदतीशिवाय अशा गोष्टींमध्ये पडू नका, असा सल्ला मी देईन. तुम्ही सकस आहार घ्या, पण मी कोणालाही या टोकाच्या पातळीवर जाऊन डाएट फॉलो करण्याचा सल्ला देणार नाही.”

रणदीपने त्याच्या डाएटबद्दलही खुलासा केला. “या काळात मी पॅलेओ डाएट, इंटरमिटेंट फास्टिंग, व्हिटॅमिन सप्लिमेंट्सचे पालन केले. कारण मला पाच दिवसांत ६ ते ७ किलो वजन कमी करावे लागले. मी या सर्व प्रक्रियेतून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली गेलो आहे. खजूर आणि दुधाने वजन कमी होते, अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या, त्या चुकीच्या आहेत. मी फक्त खजूरच खात नाही, तर अंडी, नट्स, डार्क चॉकलेट अशा गोष्टी वेगवेगळ्या टप्प्यांवर खात होतो. बऱ्याचदा मी सामान्य आहारही घेत होतो,” असं रणदीपने सांगितलं.

Story img Loader