राजकुमार संतोषी यांनी २०१६ मध्ये रणदीप हुड्डाला मुख्य भूमिकेत घेत हवालदार ईशर सिंग यांच्या मुख्य भूमिकेत ‘बॅटल ऑफ सारागढी’ची घोषणा केली होती. हीच भूमिका अक्षय कुमारने त्याच्या २०१८ मध्ये आलेल्या ‘केसरी’ या चित्रपटात साकारली होती. अक्षयने २०१८ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली आणि त्याच वर्षी तो प्रदर्शित झाला. त्यामुळे रणदीपचे तीन वर्षांचे प्रयत्न आणि मेहनत व्यर्थ गेली. ज्यामुळे तो नैराश्यात गेला होता. त्याने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.

“मी पैसे खर्च करून…”, राजकीय वादातून आंदोलकांनी चित्रपटाचं प्रमोशन थांबवल्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

Aishwarya Rai and Preity Zinta
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय व प्रीती झिंटाने ‘अनुपमा’फेम अभिनेत्याकडे केलेलं दुर्लक्ष; अनुभव सांगत म्हणाला…
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
Women mostly following actresses and exercising during pregnancy but Stop and read the doctor's warning first
महिलांनो गर्भधारणेदरम्यान अभिनेत्रींचे अनुकरण करत व्यायाम करताय? थांबा, आधी डॉक्टरांनी सांगितलेला धोका वाचा
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
PM narendra modi Chandrababu Naidu and Nitish kumar
तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा
Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

एका मुलाखतीत रणदीपने सांगितलं की राजकुमार संतोषी यांचा ‘बॅटल ऑफ सारागढी’ चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे त्याला धक्का बसला. कोणीतरी आपली मोठी फसवणूक केली असं त्याला वाटत होतं. मी तीन वर्षे ईशर सिंगच्या भूमिकेत जगलो होतो, यासाठी मी केस आणि दाढी वाढवली होती, त्या भूमिकेसाठी मी अनेक चित्रपट नाकारले होते, असंही त्याने सांगितलं. अक्षयने नंतर घोषणा करून तो चित्रपट प्रदर्शित केला, परिणामी रणदीपचा चित्रपट प्रदर्शित होऊ लागला नाही. त्या भूमिकेसाठी त्याने तीन वर्षे घेतलेली मेहनत वाया गेली आणि तो नैराश्यात गेला.

“सेन्सॉर सर्टिफिकेट्ससाठी ६.५ लाख मागितले,” अभिनेत्याच्या तक्रारीवर मोदी सरकारने दिलं उत्तर; म्हणाले,”घडलेला प्रकार…”

रणदीप ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “आयुष्यात अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटलं की आता अंधाराशिवाय काहीही नाही. मी डिप्रेशनच्या एका मोठ्या टप्प्यातून गेलो. मी सारगढीसाठी एक्स्ट्रक्शन सोडण्याचा विचार केला आणि सारागढ़ीसाठी तीन वर्षे दिली, त्या काळात मी अनेक चित्रपट सोडले. पण चित्रपट अचानक बंद झाल्याने माझ्यावर त्याचा परिणाम झाला. माझे पालक मला एकटं सोडायचे नाही. कोणीतरी माझी दाढी कापेल या भीतीने मी माझी खोली आतून बंद करून ठेवायचो. पण नंतर मी ठरवलं की मी माझ्यासोबत असं पुन्हा कधीही होऊ देणार नाही,” असं त्याने सांगितलं.

दरम्यान, आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रणदीपला एका चित्रपटासाठी तब्बल तीन वर्षे वाया घालवायला लागली. अनेक चित्रपट हातातून गेले आणि तो नैराश्यात गेला. यातून सावरायला त्याला वेळ लागला. सध्या तो ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात तो वीर सावरकांची भूमिका साकारणार आहे. तसेच दिग्दर्शनही तोच करत आहे.