करण जोहरचे सुरुवातीचे सिनेमे हे कौटुंबिक सिनेमे मानले जायचे. करणचा सिनेमा येणार म्हणजे प्रेक्षक सहकुटुंब सिनेमागृहात जायचे. परंतु एक चित्रपट असा होता ज्याने हा समज मोडून काढला. तो चित्रपट म्हणजे ‘कभी अलविदा ना केहना’. खुद्द करण जोहरनेही या चित्रपटामुळे त्याच्यावर झालेल्या टिकेबद्दल त्याचे आत्मचरित्र ‘अॅन अनसुटेबल बॉय’मध्येही सांगितलं आहे. यामागील कारणं बरीच होती.

‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटाच्या माध्यमातून विवाहबाह्य संबंध आणि शारीरिक आकर्षण अशा दोन महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं, परंतु त्यावेळी करण जोहरच्या चित्रपटातून अशा गोष्टी अपेक्षित नसल्याने हा प्रयोग तेव्हा सपशेल आपटला. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किरण खेर, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अशी तगडी स्टारकास्ट असूनसुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
chhaava movie santosh juvekar talks about last scene of movie
“आपले महाराज एकटे…”, ‘छावा’मधला ‘तो’ शेवटचा सीन आठवून संतोष जुवेकरचे डोळे पाणावले; साकारतोय ‘ही’ भूमिका

आणखी वाचा : “शाहरुख तुमचा वापर करून घेतो अन्…” किंग खानबद्दल अभिजीत भट्टाचार्यचं विधान चर्चेत

नुकतंच राणी मुखर्जीने गोव्यात सुरू असलेल्या ‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (IFFI) मध्ये या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे ज्यामुळे राणीदेखील चर्चेत आली आहे. राणी म्हणाली, “मला असं वाटतं की कभी अलविदा ना केहनासारखा चित्रपट बऱ्याच जोडप्यांनी घटस्फोट घेतले, कारण हा चित्रपट प्रेक्षकांनी अगदी टोकाचा विचार करूनच पाहिला. करणलाही या चित्रपटाकडून याच प्रतिक्रिया आल्या. या चित्रपटाने बऱ्याच लोकांचे डोळे उघडले अन् त्यांनी स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यायचं ठरवलं.”

पुढे राणी म्हणाली, “स्त्रीच्या इच्छा आणि तिची आवड याबद्दल भाष्य करायलाच हवं. एखादा पती केवळ आपल्या पत्नीला मारहाण करत नाही म्हणजे तो तिला सुखी ठेवत असेल तिच्या शारीरिक तसेच भावनिक गरजा पूर्ण करत असेल असा अर्थ अजिबात होत नाही, स्त्रियांचं मत याबाबतीत कधीच ग्राह्य धरलं जात नाही. खरंतर करणने ‘कभी अलविदा ना केहना’सारख्या बोल्ड चित्रपटातून हीच गोष्ट सांगायचं धाडस केलं. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हा काळाच्या बऱ्याच पुढचा चित्रपट आहे हे मात्र नक्की.”

Story img Loader