करण जोहरचे सुरुवातीचे सिनेमे हे कौटुंबिक सिनेमे मानले जायचे. करणचा सिनेमा येणार म्हणजे प्रेक्षक सहकुटुंब सिनेमागृहात जायचे. परंतु एक चित्रपट असा होता ज्याने हा समज मोडून काढला. तो चित्रपट म्हणजे ‘कभी अलविदा ना केहना’. खुद्द करण जोहरनेही या चित्रपटामुळे त्याच्यावर झालेल्या टिकेबद्दल त्याचे आत्मचरित्र ‘अॅन अनसुटेबल बॉय’मध्येही सांगितलं आहे. यामागील कारणं बरीच होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटाच्या माध्यमातून विवाहबाह्य संबंध आणि शारीरिक आकर्षण अशा दोन महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं, परंतु त्यावेळी करण जोहरच्या चित्रपटातून अशा गोष्टी अपेक्षित नसल्याने हा प्रयोग तेव्हा सपशेल आपटला. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किरण खेर, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अशी तगडी स्टारकास्ट असूनसुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.

आणखी वाचा : “शाहरुख तुमचा वापर करून घेतो अन्…” किंग खानबद्दल अभिजीत भट्टाचार्यचं विधान चर्चेत

नुकतंच राणी मुखर्जीने गोव्यात सुरू असलेल्या ‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (IFFI) मध्ये या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे ज्यामुळे राणीदेखील चर्चेत आली आहे. राणी म्हणाली, “मला असं वाटतं की कभी अलविदा ना केहनासारखा चित्रपट बऱ्याच जोडप्यांनी घटस्फोट घेतले, कारण हा चित्रपट प्रेक्षकांनी अगदी टोकाचा विचार करूनच पाहिला. करणलाही या चित्रपटाकडून याच प्रतिक्रिया आल्या. या चित्रपटाने बऱ्याच लोकांचे डोळे उघडले अन् त्यांनी स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यायचं ठरवलं.”

पुढे राणी म्हणाली, “स्त्रीच्या इच्छा आणि तिची आवड याबद्दल भाष्य करायलाच हवं. एखादा पती केवळ आपल्या पत्नीला मारहाण करत नाही म्हणजे तो तिला सुखी ठेवत असेल तिच्या शारीरिक तसेच भावनिक गरजा पूर्ण करत असेल असा अर्थ अजिबात होत नाही, स्त्रियांचं मत याबाबतीत कधीच ग्राह्य धरलं जात नाही. खरंतर करणने ‘कभी अलविदा ना केहना’सारख्या बोल्ड चित्रपटातून हीच गोष्ट सांगायचं धाडस केलं. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हा काळाच्या बऱ्याच पुढचा चित्रपट आहे हे मात्र नक्की.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rani mukerji says there were lot of divorces after watching kabhi alvida na kehna avn
Show comments