एकापाठोपाठ पाच फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्याचीच सर्वत्र चर्चा होत आहे. हा अक्षय कुमारचा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं म्हटलं जातंय. पहिल्या दिवशी चित्रपटाने १० कोटी व दुसऱ्या दिवशी १५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असला तरी यातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे.

‘गदर २’ की ‘ओएमजी २’, कोणत्या चित्रपटाने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी? वाचा दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे

information about RSS, RSS,
प्रचारक… संघाचा कणा!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
youth leader Shinde group, Shinde group Dombivli,
डोंबिवलीतील शिंदे गटातील युवा नेत्याला इशारा, बंडखोरांकडे दुर्लक्ष करून महायुतीचे काम जोमाने करा, श्रीकांत शिंदे यांचा सल्ला
Maharashtra ST Employees Congress General Secretary Srirang Barge allegation regarding ST employee pay hike credit
‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”
sangli municipal corporation
सांगली महापालिकेच्या वार्षिक अनुदानात ६६ कोटींची घट; ‘लाडकी बहीण’ मुळे अनुदानाला कात्री

शाळांमधील लैंगिक शिक्षण या विषयावर आधारित या चित्रपटाने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय हिंदू परिषदेने या चित्रपटात भगवान शिव यांच्या दूताची भूमिका करणाऱ्या अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला किंवा त्याला थप्पड लगावणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, हिंदू संघटनेचे अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी या बक्षिसाची घोषणा केली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आग्रा येथे अक्षय कुमारचा पुतळा आणि चित्रपटाचे पोस्टर्स जाळले.

दुसऱ्यांदा गरोदर होती रानी मुखर्जी, पण गमावलं बाळ; खुलासा करत म्हणाली, “मी पहिल्यांदाच माझ्या…”

अक्षय कुमारने चित्रपटात भगवान शिव यांच्या दूताची भूमिका केली आहे. यामध्ये तो बूट घालून दिसतो, कचोरी खरेदी करतो आणि घाण पाण्यात आंघोळ करताना दिसतो. पाराशर यांच्या मते, हा चित्रपट देवाची प्रतिमा मलिन करतो. सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

अभिनेत्री अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे निधन

दुर्गा वाहिनीच्या संस्थापक वृंदावनच्या साध्वी रिथंबरा यांनी चित्रपटावर टीका केली आहे. त्यांच्या वात्सल्य ग्राम आश्रमातील एका भाषणात त्या म्हणाल्या, “हिंदू धर्माच्या उदारतेमुळे बॉलीवूड पुन्हा पुन्हा असा उद्धटपणा करत आहे. ते हिंदू धर्म सोडून इतर कोणत्याही धर्मावर भाष्य करायला घाबरतात. याआधीही मोठ्या पडद्यावर हिंदू देव-देवतांचा अपमान झाला आहे. त्यामुळे हिंदूंच्या श्रद्धेशी खेळू नका,” असा इशारा त्यांनी दिला.