Rishi Kapoor Last Wish : अभिनेते ऋषी कपूर यांचे २०२० मध्ये निधन झाले. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर व त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर-साहनी या त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात आणि विविध मुलाखतींतूनही त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर-साहनीनं अलीकडेच एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या आठवणी सांगताना त्यांच्या अखेरच्या दोन इच्छा सांगितल्या.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमाने तिच्या वडिलांच्या अखेरच्या दोन इच्छा सांगितल्या. त्यांच्या दोन इच्छांपैकी एक इच्छा पूर्ण झाली असून, एक इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. रिद्धिमाने ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छांविषयी बोलताना सांगितलं, “त्यांची पहिली इच्छा होती की, रणबीरचा विवाह व्हावा.

SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shahid Kapoor
“माझंच नशीब…”, शाहिद कपूरने ‘विवाह’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची केलेली विनंती; खुलासा करत म्हणाला…
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज
mrinal kulkarni writes special post for husband ruchir kulkarni
मृणाल कुलकर्णींच्या पतीला पाहिलंत का? ‘सोनपरी’ने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त लिहिली सुंदर पोस्ट, म्हणाल्या…
tarkteerth lakshmanshastri joshi loksatta news
तर्कतीर्थ विचार : आंतरजातीय विवाह समर्थन
Retired professor lost jewellery worth Rs 10 lakhs recovered at Khandoba fort in Jejuri Pune news
‘मल्हारी’च्या दारी प्रामाणिकपणाची प्रचिती; जेजुरीच्या खंडोबा गडावर निवृत्त प्राध्यापिकेचे दहा लाखांचे दागिने परत

हेही वाचा…‘भागम भाग’ सिनेमाचा सिक्वेल येणार, कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या…

रिद्धिमा पुढे म्हणाली, “रणबीरच्या लग्नाबरोबरच त्यांच्या वांद्रे येथील घराचं बांधकाम पूर्ण व्हावं ही त्यांची दुसरी इच्छा होती. आमच्यासाठी हे खूप भावनिक होतं. मला खरंच वाटतं की, ते आज आमच्याबरोबर असायला हवे होते; पण देवाच्या योजना वेगळ्या होत्या.”

ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर म्हणजे २०२२ मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं. त्यामुळे ऋषी कपूर यांची पहिली इच्छा पूर्ण झाली. तर, वांद्रे येथील कपूर कुटुंबाच्या घराचं काही वर्षांपासून बांधकाम सुरू होतं आणि आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांची अखेरची इच्छा पूर्ण होणार आहे.

हेही वाचा…‘क्रिश ४’ चित्रपटाबद्दल धक्कादायक माहिती आली समोर, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी केला खुलासा; म्हणाले, “यापुढे मी…”

रणबीर-आलियाच्या साध्या आणि खास लग्नाची आठवण

रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल रिद्धिमानं सांगितलं की, तिचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं; परंतु रणबीर आणि आलिया यांनी साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिद्धिमा म्हणाली,“माझं लग्न थाटामाटात पार पडलं आणि त्यामुळे मला खूप काही एन्जॉय करता आलं नाही. माझ्या वडिलांना खूप मोठं लग्न करायचं होतं आणि त्यांनी तसं केलंही. पण रणबीरचं मत वेगळं होतं. तो म्हणाला, ‘आम्ही कुटुंबात मोठं लग्न पाहिलं आहे. यावेळी साधेपणानं करू.’ रणबीर खूप साधा मुलगा आहे. आलियाही तशीच साधी आहे. त्यामुळे त्यांना कमी लोकांमध्ये लग्न करायचं होतं.”

हेही वाचा…‘या’ कारणामुळे शाहरुख खान सोडणार होता बॉलीवूड; दिल्लीला जाण्याची तयारी करत पकडलं होतं विमान, पण…

रणबीर आणि आलियानं लग्नाच्या वेळी त्यांना महत्त्वाचे वाटणारे, नेहमी संपर्कात असणारे लोकच बरोबर असावेत, असं ठरवलं. रिद्धिमा म्हणाली, “त्यांनी सांगितलं की, ‘आम्हाला फक्त जवळचे लोक हवे आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही रोज संपर्कात असतो. त्यांच्याबरोबर आम्हाला आमचं लग्न एन्जॉय करायचं आहे.’ यामुळे ते प्रत्येक पाहुण्याला वेळ देऊ शकले आणि चांगल्या आठवणी तयार करू शकले.”

Story img Loader