सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर १४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. आरोपींनी लगेच घटनास्थळावरून पळ काढला होता. परंतु, यानंतर पुढच्या ४८ तासांत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून विकी गुप्ता आणि सागर पाल अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलमान खानचा जबाब नोंदवला आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने नेमलेल्या आरोपींनी सलमानच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. बुधवारी ( १२ जून ) एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह चार सदस्यांची टीम ४ जून रोजी सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज यांचे जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्याच्या घरी पोहोचली होती. यावेळी दोन्ही भावांची एकूण सहा तास चौकशी करण्यात आली.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
heeramandi fame actress sanjeeda shaikh opens up on woman groped her
“माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
pawan kalyan married three times
तीन लग्नं, दोन घटस्फोट अन् तिसरी पत्नी रशियन; फिल्मी आहे दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचं खासगी आयुष्य
Leopard in Rashtrapati Bhavan
Video: मोदींचे मंत्री शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनात दिसला बिबट्या? मंचाजवळून ऐटीत चालत गेला अन्…

हेही वाचा : “असला घाणेरडा परिसर”, रस्त्यावरचा कचरा पाहून शशांक केतकर संतापला; म्हणाला, “मोदीजी असोत, राहुलजी असोत किंवा…”

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, घटनेच्या दिवशी तो घरीच होता आणि पार्टीनंतर रात्री तो उशिरा झोपला. गाढ झोपेत असताना फ्लॅटच्या बाल्कनीत गोळी लागल्याच्या आवाजाने त्याला जाग आली. मोठा आवाज आल्यावर घराच्या बाल्कनीत जाऊन पाहिल्यावर त्याला कोणीही दिसलं नाही. यानंतर पोलिसांनी सलमान खानचा भाऊ अरबाजचाही जबाब नोंदवला, जो गोळीबाराची घटना घडल्यानंतर त्याच्या जुहू येथील निवासस्थानी होता. परंतु, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमानला दिलेल्या पूर्वीच्या धमक्यांबाबत अरबाजला माहिती होती. सलमानची तीन तास तर अरबाजची दोन तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. दोन्ही भावांना एकूण दीडशेहून अधिक प्रश्न विचारण्यात आले.

गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमानचे वडील सलीम खान देखील घरी उपस्थित होते. मात्र, वयोमानामुळे त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. आवश्यकता भासल्यास गुन्हे शाखेकडून त्यांचीही विचारपूस केली जाईल असं सूत्रांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : लग्नानंतर पहिल्यांदाच कोकणातल्या गावी पोहोचली पूजा सावंत, दिसली निसर्गरम्य वातावरणाची झलक

दरम्यान, १४ एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे येथे सलमान खानच्या घराबाहेर दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर, पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली होती, तर अनुज थापन आणि अन्य एका व्यक्तीला २६ एप्रिल रोजी पंजाबमध्ये ताब्यात घेण्यात आलं. याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नंतर पोलीस कोठडीत अनुज थापनचा मृत्यू झाला.