ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या या चित्रपटांची आजही चर्चा होते. हे चित्रपट तिने बॉलीवूडचे दोन्ही खान सलमान (Salman Khan) व शाहरुखबरोबर केले होते. ऐश्वर्या व सलमान २४ वर्षांपूर्वीच्या एका सिनेमात बहीण-भावाच्या भूमिकेत झळकले असते, पण नंतर ती भूमिका दुसऱ्या अभिनेत्याने केली होती, असं एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं होतं.

‘हम दिल दे चुके सनम’ नंतर सलमान खान व ऐश्वर्या राय ही बॉलीवूडच्या सर्वात लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडींपैकी एक होती. या चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतरच्या काळात दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या, त्याचदरम्यान २००० मध्ये त्यांना एका चित्रपटात भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेत घेण्यात आलं होतं.

Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
amitabh bachchan talked about rekha
रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Lakhat Ek Aamcha dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील मासिक पाळीचा सीन बघून नेटकरी म्हणाले, “असे विषय…”

मराठमोळ्या नम्रता शिरोडकरने मुलांसह केलं देवदर्शन, शेअर केले खास Photos

२००० मध्ये मन्सूर खान दिग्दर्शित ‘जोश’मध्ये ऐश्वर्याने चंद्रचूर सिंहबरोबर मुख्य भूमिका केली होती. यात शाहरुख खानने (Shahrukh Khan) ऐश्वर्याच्या भावाची भूमिका केली होती. पण सुरुवातीला यात सलमान व आमिर खान यांना मुख्य भूमिकेत घेण्याचा विचार दिग्दर्शकाचा होता, याचा खुलासा ऐश्वर्यानेच एका मुलाखतीत केला होता. “आधी या चित्रपटात आमिर व सलमान यांना घ्यायचं ठरलं होतं. नंतर चंद्रचूर व शाहरुख यांनी त्या भूमिका केल्या. चित्रपटातील इतर भूमिकांमधील कलाकार बदलले पण शर्ली तिच राहिली,” असं ऐश्वर्या म्हणाली होती.

“प्रायव्हेट पार्ट दाखवला, दगड फेकले,” बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक अनुभव; म्हणाली, “शिक्षिकेने सांगितलं माझीच चूक…”

दरम्यान, ब्रेकअपनंतर ऐश्वर्या व सलमान यांनी कधीच एकत्र स्क्रीन शेअर केली नाही. ऐश्वर्याने ‘बाजीराव मस्तानी’मध्ये मस्तानीची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्या चित्रपटात सलमानने ‘बाजीराव’ साकारावे असं तिला वाटत नव्हतं. संजय लीला भन्साळी आधी ऐश्वर्या व सलमानला घेऊन हा चित्रपट करणार होते. नंतर यात रणवीर सिंह व दीपिका पादुकोण यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. याबाबत ऐश्वर्याने एकदा वक्तव्य केलं होतं. “मला मस्तानीची भूमिका करायची होती पण त्यांच्या (संजय लीला भन्साळी) मनात असलेल्या बाजीरावबरोबर नाही नाही,” असं ऐश्वर्याने म्हटलं होतं.