बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर २०१४ पासून ती मनोरंजन सृष्टीपासून लांब आहे. २०१५ मध्ये समीराने पहिल्या बाळाला जन्म दिला. यानंतर तिचे वजन प्रचंड वाढले होते. याविषयी अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.

हेही वाचा : “स्वत:ची लायकी सोडून…”, पूजा सावंतने ट्रोलिंगबद्दल मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “त्या आक्षेपार्ह कमेंट्स…”

vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Rajkummar Rao and Patralekhaa Love Story
“तो खूप विचित्र…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा; म्हणाली, “मुंबई पुणे प्रवासात त्यानेच…”
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले

जेनिस सिक्वेराच्या युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत समीरा रेड्डीने प्रसूतीनंतर तिच्यात काय बदल झाले? लोक तिला काय म्हणायचे? याबाबत खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या पहिल्या गरोदरपणात मला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. माझं वजन प्रचंड वाढलं होतं. माझ्या घरी येणाऱ्या भाजीवाल्याने मला विचारलं दीदी तुम्हाला काय झालंय? हे ऐकून मी हैराण व्हायचे. आपल्या भारतीयांमध्ये एखाद्याला वैयक्तिक आयुष्याविषयी विचारण्याचे धाडस कुठून येते? याबद्दल मला आजवर कळालेले नाही.”

हेही वाचा : “‘ळ’ चा उच्चार करता येत नव्हता”, वैभव तत्त्ववादीने सांगितला जुना किस्सा; म्हणाला, “वरिष्ठ डोक्याला हात लावून…”

समीरा पुढे म्हणाली, “मला प्रसूतीनंतर पापाराझींची भीती वाटायची. पापराझी माझे फोटो काढतील म्हणून मी घराबाहेर सुद्धा पडायचे नाही. आता त्या गोष्टी आठवून समीरा तू स्वत:शी असे का वागलीस? असे म्हणायची वेळ येते कारण, आता मला कोणत्याच कमेंट्सचा फरक पडत नाही.”

हेही वाचा : ‘गदर २’ की ‘ओएमजी २’, कोणत्या चित्रपटाने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी? वाचा दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे

दरम्यान, समीरा रेड्डीने ‘रेस’, ‘डरना मना है’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘दे दना दन’, ‘आक्रोश’, ‘मुसाफिर’, ‘जय चिरंजीव’, ‘अशोक’, ‘वरणम आयाराम’ आणि ‘तेज’ अशा अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये पाहिले आहे. २०१४ मध्ये उद्योगपती अक्षय वर्देसह लग्न केल्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. तिने २०१५ मध्ये मुलगा हंस आणि २०१९ मध्ये मुलगी नायराला जन्म झाला. आता अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.