सेलिब्रिटी जोडपं मोहम्मद झीशान अय्युब आणि मराठमोळी रसिका आगाशे दोघेही ‘स्कूप’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. झीशानने या सीरिजमध्ये ‘इमरान’ ही भूमिका साकारली होती, तर रसिकानेही यामध्ये जेलमधील महिला पोलिसाची भूमिका साकारली होती. या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल भाष्य केलं. या दोघांनी मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या दिवसातील अनेक किस्से सांगितले.

’72 Hoorain’: चित्रपट अप्रूव्ह पण ट्रेलर रिजेक्ट, सेन्सॉर बोर्डावर संतापलेले निर्माते म्हणाले, “एका मृतदेहाचे…”

Jitendra Kumar remembers junior dying
“IIT मध्ये पहिल्याच दिवशी ज्युनिअरने स्वतःला संपवलं,” ‘कोटा फॅक्टरी’च्या जितेंद्र कुमारने सांगितला खऱ्या आयुष्यातला अनुभव
an old lady coming in Pandharpur Wari from last 30 years
३० वर्षांपासून आज्जी करतेय वारी! “वारीत आल्यावर कसे वाटते?” आजी काय म्हणाली, पाहा VIDEO
Chhagan Bhujbal and Manoj Jarange
“तुला माझ्याबरोबर लग्न करायचंय का?”, छगन भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचं मिश्किल सवाल, म्हणाले…
Suicide of a young man in Dombivli suffering from mental illness after corona
करोनानंतर जडलेल्या मानसिक आजाराने त्रस्त डोंबिवलीतील तरूणाची आत्महत्या
What Murlidhar Mohol Said?
“गोपीनाथ मुंडेंनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते…”, आठवणी सांगताना मुरलीधर मोहोळ भावूक
Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”
Nana Patole Washing Feet
कार्यकर्त्याने पाय धुतल्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “कार्यकर्ता वरून…”
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून उत्तीर्ण झाल्यावर या दोघांनी अवघे २४ वर्षांचे असताना लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता १६ वर्षे झाली आहेत. लग्नानंतर ते दिल्लीहून मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ४० हजार रुपये होते. ‘सिद्धार्थ कनन’ला दिलेल्या मुलाखतीत रसिका म्हणाली, “आम्ही अशी वेळ पाहिली आहे, ज्यावेळी आमच्याजवळ एक रुपयाही नव्हता. आमचे २४ व्या वर्षी लग्न झाले, त्यामुळे आम्ही खूप भोळे होतो. आम्हाला वाटलं मुंबईत जगायला ४० हजार रुपये पुरेसे आहेत. पण ते दुसऱ्याच दिवशी घराचं डिपॉझिट भरण्यात संपले. पण आम्ही दुःखी नव्हतो. आमचं एका खोलीचं घर होतं, पण आमचे मित्र रोज संध्याकाळी आमच्याकडे चहा प्यायला यायचे. आता घर मोठं आहे, पण संध्याकाळ अजूनही चहा आणि मित्रांसाठी आहे.”

“तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?” अभिनेत्रीचा ‘ढोबळी’ उल्लेख करत अवधूत गुप्ते म्हणाला, “ती माझ्या…”

घरासाठी फक्त एका महिन्याचं डिपॉझिट द्यावं लागतं, पण ब्रोकरने आमच्याकडून तीन महिन्यांचं घेतलं होतं, असं झीशानने सांगितलं. त्या कठीण काळात अभिनेता विनीत कुमारने मदत केली आणि त्याला काम मिळालं, त्या कामाचे १५ हजार रुपये मिळाले होते. “आम्ही घरात बसून विचार करत हसत होतो की आपण किती मूर्ख आहोत ना, एवढ्या पैशात मुंबईत सगळं होईल म्हणून निघून आलो. तेव्हा विनीतने मदत केली. कोणीतरी अॅक्टिंग स्कूल सुरू करत होतं आणि त्यासाठी तीन महिन्याचा सिलॅबस मला लिहून देण्यास सांगितलं. मी एका रात्रीत तो लिहून दिला. पण त्याची झेरॉक्स काढायला आणि घरात दोन रुपये शोधत होतो. त्यानंतर मी तो सिलॅबस सबमिट केला आणि त्या माणसाने मला १५ हजार रुपये दिले होते,” असं झीशान म्हणाला.

रसिका व झीशान दोघेही २५ रुपयात चायनीज खाऊन पोट भरायचे. असाच संघर्ष सुरू असताना झीशानला ‘नो वन किल्ड जेसिका’ व ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ हे चित्रपट मिळाले. पण नवीन असल्याने तेव्हा कामाचा मोबदला जास्त मिळत नव्हता. “मी चित्रपट करत होतो, पण पैसे कमी मिळायचे. त्यामुळे तीन वर्षे रसिका डबल शिफ्टमध्ये काम करायची. दादरमध्ये नाटक करून ट्रेनने दहिसरला मालिकेचं शूटिंग करायला जायची. सुरुवातीची तीन वर्षे तिनेच पैसे कमवून घर चालवलं होतं,” असं झीशानने सांगितलं.

आनंद एल राय दिग्दर्शित ‘रांझणा’ चित्रपट आल्यानंत झीशानच्या करिअरला गती मिळाली. नंतर त्याने ‘तनु वेड्स मनू: रिटर्न्स’, ‘रईस’ आणि ‘तांडव’ यांसारख्या चित्रपट आणि शोमध्ये काम केले.