शाहरुख खान आणि त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याबरोबरच शाहरुख ‘कोलकाता नाइट रायडर्स’ या आयपीएल टीमचा मालक आहे. त्याच्याबरोबरच अभिनेत्री जुही चावलादेखील यात भागीदार आहे. आयपीएलमध्ये टीम विकत घेतल्यानंतर त्याला आलेले अनुभव शाहरुखने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ साली लागलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे ‘आयपीएल’चे सामने आबू धाबीमध्ये खेळवले गेले होते. तेव्हा शाहरुखची टीम लागोपाठ हरत होती आणि त्याच अनुभवाबद्दल शाहरुखने सांगितलं आहे. रॉबिन उथप्पाशी संवाद साधताना शाहरुखने सामना हरल्यावर त्याला नेमकं कसं वाटायचं आणि तो काय करायचा याबद्दल खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘बेशरम रंग’नंतर ‘पठाण’चं दूसरं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; पुन्हा दिसणार शाहरुख-दीपिकाची हॉट केमिस्ट्री

शाहरुख म्हणाला, “२०१४ च्या अबू धाबीमधील सामन्यांना सुरुवात झाली आणि जेव्हा आपण बहुतेक सामने हरत होतो तेव्हा मला चांगलं आठवतं, मी माझ्या लहान मुलांना कवटाळून हॉटेलच्या रूमवर भरपूर रडायचो. त्यावेळी संघ पराभूत होताना पाहून आम्हाला खूप दुःख व्हायचं. पण नंतर जेव्हा पुढील काही सामने भारतात खेळवले गेले तेव्हा मात्र संघाचा खेळ पाहून थोडं हायसं वाटलं.”

इतकंच नाही तर तेव्हा पंजाबच्या संघाला हरवून शाहरुखच्या कोलकाता संघाने ‘आयपीएल ट्रॉफी’वर स्वतःचं नाव कोरलं होतं. केकेआरचे सामने बघून शाहरुखला प्रचंड प्रेरणा मिळायची आणि बऱ्याचदा तो निराशही व्हायचा असंही त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं. शाहरुखचा ‘पठाण’ २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan said he used to cry with his kids in hotel room when kkr used to loose match in ipl avn