अभिनेता शेखर सुमन सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकतंच आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल सांगितलं. त्यांच्या मुलाचं ११ व्या वर्षी एका दुर्मिळ आजाराने निधन झालं होतं. त्याचं नाव आयुष होतं आणि तो त्यांचा मोठा मुलगा होता. मुलाची प्रकृती गंभीर असूनही एका दिग्दर्शकाने त्यांना शूटिंगसाठी बोलावलं होतं, त्यावेळी आजारी मुलाने आपला हात पकडून न जाण्याची विनंती केली होती, तो प्रसंग शेखर सुमन यांनी सांगितला. मुलाच्या मृत्यूनंतर घरातील सर्व मूर्ती फेकून दिल्या होत्या, असा खुलासा त्यांनी केला.

“चमत्कार कधीच होत नाहीत,” असं कनेक्ट एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत शेखर म्हणाले. त्यांनी एक प्रसंग सांगितला जेव्हा मुलगा आजारी असताना त्यांना दिग्दर्शकाने शूटिंगला बोलावलं होतं. “एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता आणि आयुष खूप आजारी होता. माझ्या मुलाची अवस्था गंभीर होती, ती परिस्थिती समजून घेत दिग्दर्शकाने मला दोन-तीन तास शूटिंगसाठी येण्याची विनंती केली होती. मी नकार दिला, पण तो म्हटला की त्याचं खूप नुकसान होईल. मग मी त्याला होकार दिला. मी निघणार होतो तेवढ्यात आयुषने माझा हात धरला आणि म्हणाला, ‘पप्पा, आज नका जाऊ, प्लीज’. पण मी त्याचा हात सोडवला आणि त्याला वचन दिलं की मी लवकरच परत येईन, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही,” असं शेखर सुमन म्हणाले.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”

प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटामाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos

आयुषच्या निधनानंतर देवावरचा विश्वास उडाला होता आणि आपण घरातील मंदिर बंद केलं होतं, असं शेखर यांनी सांगितलं. “मी सर्व धार्मिक मूर्ती काढून घराबाहेर फेकल्या व मंदिर बंद केलं होतं. मी म्हणायचो की ज्या देवाने मला एवढं दु:ख दिलं, माझ्या सुंदर व निरागस मुलाचा जीव घेतला, त्या देवाकडे मी कधीच जाणार नाही,” असं शेखर म्हणाले. आयुष आजारी असताना त्याचा त्रास इतका वाढला होता की त्याच्या निधनासाठी शेखर सुमन यांची पत्नी प्रार्थना करायची. या दुःखातून आपण अजुनही सावरलो नसून आयुषची आठवण येते, असं शेखर सुमन यांनी सांगितलं.

गोविंदाच्या भाचीने सोडला हिंदू धर्म? अभिनेत्री रागिनी खन्ना धर्मांतराच्या ‘त्या’ पोस्टबद्दल म्हणाली, “मी माझा धर्म…”

१९८९ मध्ये मुलगा आजारी आहे हे कळाल्यावर शेखर यांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या होत्या. त्यावेळी करिअर, आयुष्य, कुटुंब अगदी सगळं संपल्यासारखं वाटत होतं. एकेदिवशी मुलगा सोडून जाणार हे माहित असूनही मी प्रत्येक दिवस त्याच्यासोबत घालवायचो, असं त्यांनी सांगितलं. “मला जेव्हा माझ्या मुलाच्या दुर्मिळ आजाराबद्दल कळालं तेव्हा तो आठ महिने जगेल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण तो आठ महिने नव्हे तर चार वर्षे जगला,” असं शेखर सुमन म्हणाले.

गौहर खानच्या एक्स बॉयफ्रेंडशी लग्न करतेय ‘ही’ अभिनेत्री? १३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह साखरपुड्याच्या चर्चांवर म्हणाली…

शेखर मुलाला उपचारासाठी लंडनला घेऊन गेले होते, परंतु जोखीम असल्याने डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण करण्यास नकार दिला. मुलाला जगभरातील अनेक डॉक्टरांकडे नेलं होतं, मुलाला बरं व्हावं यासाठी बौद्ध धर्माकडे वळलो, पण चमत्कार घडत नाही हे मला कळून चुकलं, असंही शेखर सुमन यांनी नमूद केलं. शेखर सुमन यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं असून त्यांना अध्ययन सुमन नावाचा एक मुलगा आहे.

Story img Loader