सध्या बॉलिवूडच्या मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटत आहेत तर स्टार्स नसलेले ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा गल्ला जमवत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’सोडला तर यावर्षीदेखील इतर कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला इतकं घवघवीत यश मिळालेलं नाही. या एकंदर परिस्थितीविषयीच चित्रपट समीक्षक आणि सिनेतज्ञ तरण आदर्श यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना तरण आदर्श यांनी चित्रपट व्यवसायाच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर चित्रपट वितरकांना फायदा होईल असे चित्रपट निघाले पाहिजेत असं तरण आदर्श यांचं निरीक्षण आहे. ही गोष्ट स्पष्ट करताना त्यांनी ‘पठाण’चं उदाहरण देत यावर वक्तव्य केलं.

आणखी वाचा : ‘Tiger 3’च्या सेटवर सलमान खानला दुखापत; भाईजानने ट्वीट करत लिहिलं, “टायगर…”

मुलाखतीमध्ये तरण आदर्श म्हणाले, “चित्रपट वितरक यांचा फायदा होणं हे सध्या चित्रपट व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कोविडनंतर त्यांना जबरदस्त फटका बसला आहे. सध्या चित्रपटसृष्टी आयसीयु (ICU)मध्ये आहे. पठाणला जबरदस्त यश मिळालं, पण त्या एकाच चित्रपटावर अवलंबून राहू शकत नाही. जर बॉक्स ऑफिसवर लोकांची गर्दी हवी असेल तर असे आणखी ‘पठाण’ प्रदर्शित होणं चित्रपटसृष्टीसाठी अत्यावश्यक आहे.”

याबरोबरच सध्या प्रादेशिक कथांवर भर द्यायला पाहिजे असंही तरण आदर्श यांनी स्पष्ट केलं. याबरोबरच सध्या चित्रपटसृष्टी ही अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये आहे आणि चित्रपट निर्मात्यांनी रिमेकच्या कुबड्या सोडून काहीतरी नवीन प्रेक्षकांना द्यायला पाहिजे असंही निरीक्षण तरण आदर्श यांनी या मुलाखतीमध्ये मांडलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trade expert taran adarsh says film industry is in an icu we need multiple pathaan avn