विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ‘लायगर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. चित्रपटाचा ट्रेलर जिथपासून प्रदर्शित झाला तिथपासूनच ‘बॉयकॉट लायगर’ हा ट्रेंड सुरु झाला. पण चित्रपटावर याचा परिणाम होणार नाही असंही बोललं जात होतं. विजयचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचंही या चित्रपटाशी नाव जोडलं होतं. तो या चित्रपटाचा सहनिर्माता होता. आता विजय-करण पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.

पुरी जगनाथ यांनी ‘लायगर’चं दिग्दर्शन केलं. चित्रपटाला अपयश मिळाल्यानंतर विजय व पुरी जगनाथ यांचं काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा होती. मात्र करणने विजयची साथ सोडली नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार करण व विजय पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
gang stabbed young man with koyta in dandiya event
दांडीया कार्यक्रमात टोळक्याची दहशत, तरुणावर कोयत्याने वार; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने व्याख्या करणारे…”, रतन टाटांच्या निधनानंतर गौतम अदाणी यांनी व्यक्त केल्या भावना
pimpri chinchwad police solve murder case
पिंपरी- चिंचवड: धमकी, मारहाणीला कंटाळून मित्राची हत्या; केला असा प्लॅन..पण पोलिसांनी पाठलाग करून….
No action has been taken against unauthorized boards due to pressure of political leaders
पालिका आयुक्तांच्या आदेशाला कोणी दाखविली केराची टोपली
The reservation of the well known Satyam cinema hall in Worli will be changed Mumbai print news
वरळीतील सत्यम’ चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जाणार; आरक्षण बदलण्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती सूचना
Pune bopdev ghat gangrape accuse sketch and video
Bopdev Ghat Gangrape: हेच ते नराधम! बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींचं स्केच, सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर

करण स्वतः एका नव्या हिंदी चित्रपटाची निर्माती करत आहे. या चित्रपटाबाबत करण व विजयमध्ये बोलणं झालं असल्याच्याही चर्चा आहे. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. विजयच्या अॅक्शनपट चित्रपटाला प्रेक्षकांनी ना पसंती दर्शवली होती. म्हणून आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चित्रपट करण्याचं दोघांनीही टाळलं आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम दिशा वकानीला घशाचा कर्करोग? कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य, म्हणाले, “आवाज काढल्यामुळे…”

‘लायगर’च्या अपयशानंतर विजयने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान याबाबत भाष्य केलं होतं. “आपल्या सगळ्यांचेच काही चांगले तर काही वाईट दिवस असतात. पण आपल्याला काहीही वाटत असलं तरी पुन्हा नव्या जोमाने काम करावंच लागतं.” असं विजय म्हणाला होता.