बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या चर्चेत आहे. मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसली आहे. हा चित्रपट दक्षिण भारतातील चोल साम्राज्यवर बेतलेला आहे. दिग्दर्शक मणिरत्नम कायमच वेगळ्या धाटणीचे चित्रपट आपल्या भेटीस घेऊन येत असतात. ‘बॉम्बे’, ‘रोजा’ ‘दिल से या’ चित्रपटात संवेदनशील विषय त्यांनी उत्तमरीत्या मांडले होते. अभिनेत्री ऐश्वर्या रायनेदेखील आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा मणिरत्नम यांच्या चित्रपटातून केला होता. चक्क या चित्रपटासाठी तिने बॉलिवूडचे चित्रपट नाकारले होते.

ऐश्वर्या रायने मागे फेमिना मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पदार्पणाबद्दल सांगितले होते की, ‘दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी मला ‘राजा हिंदुस्थानी’ या चित्रपटासाठी विचारले होते तर यश चोप्रा यांनी मला ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटासाठी विचारले होते. त्याचदरम्यान मला मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ चित्रपटासाठी विचारण्यात आले. मणिरत्नम यांच्या चित्रपटाची मी आधीपासून चाहती होते. त्यामुळे हा चित्रपट मी केला. नवोदित कलाकरांना चित्रपटात काम करण्यासाठी बराच काळ वाट बघावी लागते मात्र माझ्याकडे आधीच पदार्पणात २,३ चित्रपट होते’.

Paani Movie on the Water Crisis
Paani Movie Review : पाणी संघर्षाला प्रेमाचा ओलावा
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
tv serial actress arrested for kidnapping 4 year child in vasai zws
अपहृत चिमुकल्याची ४ तासात सुखरूप सुटका; टिव्ही मालिकेतील अभिनेत्रीला अटक
Hindi subject from the first class Criticism from education sector on schedule change Criticism from education sector
राज्याचे स्वतंत्र शैक्षणिक अस्तित्व संपवायचे आहे का? पहिलीपासून हिंदी, वेळापत्रक बदलावर शिक्षण क्षेत्रातून टीका
Shraddha Kapoor unveils the Express Group Screen magazine
दिमाखदार कार्यक्रमात ‘स्क्रीन’ पुन्हा वाचकांच्या भेटीला
vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
The reservation of the well known Satyam cinema hall in Worli will be changed Mumbai print news
वरळीतील सत्यम’ चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जाणार; आरक्षण बदलण्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती सूचना
compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली

अक्षयच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, रक्षाबंधन आता ‘ओटीटीवर’ होणार प्रदर्शित!

इरुवर हा चित्रपट हा चित्रपट कल्की कृष्णमूर्तीच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार होते. तब्बू, प्रकाश राज, मोहनलाल यांच्या दमदार अभिनयाने चित्रपट गाजला होता. या चित्रपटाचे लेखन मणिरत्नम एलांगो कुमारवेल आणि बी. जयमोहन यांनी केले होते. तर मद्रास टॉकीज आणि लायका प्रॉडक्शन या संस्थांनी चित्रपटाची निर्मिती केली होती.

ऐश्वर्या रायने ‘और प्यार हो गया या’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आपल्या करियरची सुरवात तिने मॉडेलिंग क्षेत्रापासून केली. त्यानंतर तिने काही जाहिरातींमध्ये काम केले. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘धूम २’ हे तिचे गाजलेले चित्रपट. मणिरत्नम यांनी गुरु चित्रपटातदेखील ऐश्वर्या रायला एक उत्तम भूमिका दिली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटात तिचा नायक अभिषेक बच्चन होता ज्याच्यासोबत तिने आपली लग्नगाठ बांधली. सध्या तिचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे.