सलमान खानचे भाऊ सोहेल आणि अरबाज खान खूप लोकप्रिय आहेत. दोघेही लोकप्रिय अभिनेते आहेत. अरबाज चित्रपट निर्माताही आहे. सोहेल व अरबाज यांनी अरबाजचा मुलगा अरहान आणि त्याच्या मित्रांनी होस्ट केलेल्या ‘डंब बिर्याणी’ या नवीन वेब शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या अपयशाबद्दल विधान केलं.

अरबाज आणि सोहेल दोघांचेही घटस्फोट झाले आहेत. काही लग्नं का मोडतात, याबाबत त्यांनी त्यांची मतं मांडली. जेव्हा आपण नात्याती उत्साह गमावतो समजदारीने आयुष्यात पुढे जाणं आवश्यक आहे, असं सोहेलला वाटतं. तर अरबाजच्या मते कोणतंही नातं केवळ एका व्यक्तीभोवती फिरणारं नसावं. प्रत्येक नातं एका एक्सपायरी डेटसह येतं, असं सोहेलने म्हटलं.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

दिव्या भारतीने निधनाआधी दारू प्यायली होती, अभिनेता कमल सदानाचे विधान; म्हणाला, “आम्ही एकत्र शूटिंग…”

“तुमचं किंवा तुमच्या जोडीदाराचं काय होईल हे दडपण नात्यात आपल्यावर येतं. हे दडपण कायमच असतं. ते नातं संपेपर्यंत हे दडपण असतं. जोपर्यंत तुम्ही एकत्र आनंदी आहात तोवर त्यात कटुता येऊ देऊ नका. कारण तेव्हाच तुमच्या मनात जोडीदाराबद्दल नकारात्मक भावना येऊ लागतात. प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी असते. अगदी औषधं, चॉकलेट, अन्न सर्वांचीच. तुमच्या नात्यातला उत्साह संपला की तुम्ही समजुतदारपण पुढे जा. यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे. ब्रेकअपनंतर एखाद्याचा इगो दुखावणं हे साहजिक आहे,” असं सोहेल म्हणाला.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस पूर्ण, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

अरबाज म्हणाला, “नात्यात येण्याची योग्य वेळ म्हणजे तुम्हाला त्यातून काय मिळतंय हा विचार न करता तुम्ही देण्यास तयार असता. काही जण नात्यातून काहीतरी हवंय या हेतूने येतात आणि मग विसरतात की त्यांनाही या नात्यात काहीतरी द्यावं लागेल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये का आहात, यासाठी कारण असावं लागतं. जर नातं एकतर्फी असेल तर ते एका ठराविक काळानंतर टिकणार नाही. नात्यात संवाद महत्त्वाचा असतो.” यावेळी त्याने निकाहचं महत्त्व सांगितलं. “तुम्ही एका पेपरवर सही करता आणि म्हणता की तुम्ही तुमच्या जोडीदाराची काळजी घ्याल,” असं अरबाज म्हणाला. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मित्रांप्रमाणे संवाद साधू शकलात तर ते नातं जास्त काळ टिकण्याची संधी असते, असं अरबाजला वाटतं.

“ते आधीच विवाहित होते,” लग्न गुपित ठेवण्याबद्दल अरुणा इराणींचा खुलासा; मूल होऊ न देण्याबाबत म्हणाल्या, “तो निर्णय…”

दरम्यान, सोहेल खानबद्दल बोलायचं झाल्यास त्याचं १९९८ मध्ये सीमा सजदेहशी लग्न झालं होतं. ते २०२२ मध्ये विभक्त झाले. त्यांना निर्वाण आणि योहान अशी दोन मुलं आहेत. तर, अरबाजने मलायका अरोराशी लग्न केलं होतं, ते २०१७ मध्ये विभक्त झाले. त्याने शुरा खानशी २०२३ मध्ये दुसरं लग्न केलं. अरबाजला मलायकापासून अरहान नावाचा मुलगा आहे.

Story img Loader