अंबानी कुटुंबियांच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये कलाक्षेत्रामधील अनेक मंडळी हजेरी लावताना दिसतात. अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणाऱ्या कलाकारांची बी-टाऊनमध्ये चर्चाही रंगताना दिसते. ईशा अंबानीच्या लग्नात अशीच एक चर्चा रंगताना दिसली. ईशा अंबानीच्या लग्नामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार जेवण वाढताना दिसले. यादरम्यानचे बरेच फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

१२ डिसेंबर २०१८मध्ये ईशा व आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. शिवाय अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार जेवण वाढताना दिसले.

anjali damania on dhananjay Munde
Dhananjay Munde : अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक, एक्स पोस्टद्वारे इशारा; म्हणाले, “मोघम आरोप करणाऱ्या…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
Anjali Damania on Shashtri
Anjali Damania : “अतिशय आदरपूर्वक मला…” महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Mamta Kulkarni net worth
५२ व्या वर्षी संन्यास घेणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीची संपत्ती किती? वाचा…
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

आणखी वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील परीची हिंदी मालिकेमध्ये एंट्री, प्रोमो पाहून प्रार्थना बेहरेची कमेंट, म्हणाली, “बेबी…”

शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन यांसारख्या मंडळींनी या शाही विवाहसोहळ्यामध्ये जेवण वाढलं. या कलाकार मंडळींचे जेवण वाढतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं. अंबानी कुटुंबियांकडे जेवण वाढण्यासाठी माणसं असतानाही कलाकारांनी जेवण का वाढलं? असे अनेक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात आले.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गौरव मोरेचा सतत अपमान का होतो? अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “कधी कधी…”

यादरम्यान सतत होणारी ट्रोलिंग पाहून अभिषेक बच्चनने ईशा अंबानीच्या लग्नात जेवण वाढण्यामागचं कारण सांगितलं होतं. तो सांगितलं होतं की, “ही एक भारतीय परंपरा आहे. याला ‘सज्जन घोट’ असं म्हणतात. या पारंपरिक पद्धतीमध्ये वधुपक्षातील लोक वरपक्षातील पाहुण्यांना स्वत: जेवण वाढतात”. अभिषेकच्या या वक्तव्यानंतर ऐश्वर्या व अमिताभ यांनी या लग्नामध्ये पंगतीला जेवण का वाढलं? याचं खरं कारण समोर आलं.

Story img Loader