अभिनेत्री माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी व डॉ. नेने यांनी इतकी वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय का घेतला, यामागचं कारण सांगितलं आहे.

डॉ. श्रीराम नेने म्हणाले, “मी २० वर्षे हार्ट सर्जरी करत होतो आणि प्रत्येक दिवसाला मी तीन ते पाच केसेस सांभाळत होतो. फायदा खूप होता आणि रिवॉर्ड्सही खूप होते. माझे खूप रुग्ण बरे झाले, ते पाहून मलाही छान वाटायचं. पण डॉक्टर होण्यापूर्वी मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सगळं टेक्नॉलॉजीचं काम करत होतो. मला २०११ मध्ये वाटलं की भारताला खूप गरज आहे, त्यामुळे मी तिथून इथे आलो.”

Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
woman in Andheri w is infected with gbs widespread in districts like Pune
अंधेरीमध्ये सापडला जीबीएसचा रुग्ण, सेव्हन हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल
Vasmat engineer Yogesh Panchal returns home safely from Iran
वसमतचे अभियंता योगेश पांचाळ इराणहून सुखरूप मायदेशी परतले
Vakrangee Technology, Dinesh Nandwana Death ,
मुंबई : ईडीची निवासस्थानी शोधमोहीम सुरू असताना व्यावसायिकाचा मृत्यू
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
thane yashodhan nagar two men disguised policeman demanded money from Ayurvedic doctor
पोलिसांच्या वेषात येऊन वर्गणी मागणी, ठाण्यातील एका आयुर्वेदिक दवाखान्यातील घटना

बॉलीवूडचा २०२३ मधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, देशभरात कमावले फक्त १० हजार रुपये; तुम्ही पाहिलाय का?

डॉ. नेने यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांची प्रतिक्रिया काय होती, याचा खुलासा त्यांनी ‘एबीपी माझा’ ला दिलेल्या मुलाखतीत केला. “मी इथे यायचा निर्णय घेतल्यावर माझ्या महाराष्ट्रीय आई-वडिलांना धक्का बसला. कारण मी एका हॉस्पिटलचा हेड होतो. एका वर्षात ५०० केस सांभाळत होतो आणि ते सगळं सोडून मुंबईला यायचं. पण आता त्यांना कळलंय की मी हेल्थकेअर, शिक्षण आणि चित्रपटांसाठी कंपन्या बनवल्या आहेत,” असं ते म्हणाले.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या

“आपला हेतू काय आहे आणि त्यातून आपल्याला किती आनंद मिळतोय हे आपण बघायला हवं, कारण ते आपल्याला शाळेत नाही शिकवत. आम्ही मुलांनाही सांगितलंय की तुम्हाला हवं ते करा. आमची मुलं आमच्या दोघांच्या क्षेत्रापैकी कुठे जाणार माहिती नाही. खरं तर भारताला फक्त डॉक्टर्स, इंजिनिअर्स आणि वकील नको आहेत, सगळ्या प्रकारचे लोक पाहिजेत,” असं डॉ. नेने म्हणाले.

सैफ अली खानने अवघ्या २१ व्या वर्षी अमृता सिंहशी लग्न का केलं होतं? आता तिच्याशी कसं नातं आहे? उत्तर देत म्हणाला…

“मी परत भारतासाठी नक्कीच आलो, संस्कृतीसाठी आलो कारण भारताची संस्कृती व्यवस्थित आहे. त्यातही महाराष्ट्राची संस्कृती जास्त व्यवस्थित आहे,” असं डॉ. श्रीराम नेने म्हणाले. तर मुलं तिथं (अमेरिकेत) एका वेगळ्याच वातावरणात वाढतात, त्यामुळे भारतात लोक कसे जगतात हे त्यांना कळावं म्हणून परत येण्याचा निर्णय घेतला होता, असं माधुरी दीक्षितने सांगितलं.

Story img Loader