हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना त्यांच्या त्यांच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत होते. असं म्हणतात राजेश खन्ना यांचे पहिले प्रेम अभिनेत्री अंजू महेंद्रू होत्या. परंतु तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, त्यांनी स्वतःपेक्षा खूपच लहान असलेल्या डिंपल कपाडियांशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वेगळे राहू लागले. डिंपल यांनी राजेश खन्नांना घटस्फोट दिला नाही. एकदा खुद्द राजेश खन्ना यांनी घटस्फोट न देण्यामागचे कारण सांगितले होते.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’मधील रेप सीनबाबत आपल्या आजीच्या प्रतिक्रियेने घाबरली होती अदा शर्मा; म्हणाली…

Saif Ali Khan
“दरोड्याचा प्रयत्न फसला…”, सैफ अली खानचे हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या बिचाऱ्या…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
dilip kumar
दिलीप कुमार झोपलेले असताना धर्मेंद्र त्यांच्या घरात घुसले होते; अभिनेते म्हणालेले, “मी घाबरत जिना उतरला अन्…”
नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”

१९९० साली राजेश खन्ना यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तुम्ही डिंपल कपाडियांबरोबर एकत्र पुन्हा याल का. यावर राजेश खन्नांनी उत्तर दिलं होतं परत म्हणजे काय? अगोदर आम्ही कुठं होतो. आम्ही वेगळे राहतो पण आमचा घटस्फोट झालेला नाही. कारण तीच घटस्फोट देत नाहीये. आणि का देत नाही याचं उत्तर तुम्हीच तिला विचारा. योग्य उत्तर तर तिच देईल. मी फक्त एवढचं म्हणेन या सगळ्या मनाच्या गोष्टी आहेत.”

हेही वाचा- सलमान खान बांधणार १९ मजली आलिशान हॉटेल; कोणाच्या नावावर आहे प्रॉपर्टी, कोणत्या सुख-सुविधा मिळणार? जाणून घ्या

डिंपल कपाडिया केवळ १६ वर्षांची असताना त्यांनी राजेश खन्नाबरोबर लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना अशा दोन मुली झाल्या. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यात मतभेद झाले आणि डिंपल यांनी मुलींना घेऊन घर सोडलं. मात्र, डिंपल यांनी कधीही राजेश खन्ना यांना घटस्फोट दिला नाही. कॅन्सरमुळे राजेश खन्ना यांची तब्येत बिघडली तेव्हा हे दोघे २०१२ मध्ये एकत्र राहू लागले होते. राजेश खन्नाच्या निधनाआधी अखेरचा काळ डिंपल त्यांच्याबरोबर होत्या. १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.

Story img Loader