अक्षय कुमार हा चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कधी त्याच्या नागरिकत्वासाठी तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यामुळे त्याला ट्रोल केले जाते. अक्षय कुमार राजकारणात येणार असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशाच बातम्या समोर येत आहेत. अक्षय कुमार भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. त्यापूर्वीच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या जागांसाठी वेगवेगळ्या दावेदारांची नावे समोर येत आहेत. ‘दी लल्लनटॉप’च्या वृत्तानुसार अक्षय कुमारला भाजपने तिकीट दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. तो दिल्लीतील चांदनी चौकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो असंही सांगण्यात येत आहे. भाजप नेते आणि अक्षय कुमार यांच्यात निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.

Delhi assembly elections 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?

आणखी वाचा : अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी अंबानींनी खर्चे केले तब्बल ‘इतके’ कोटी; वाचून व्हाल थक्क

अद्याप या गोष्टीची पुष्टी ना अक्षय कुमारने केली आहे आणि ना भारतीय जनता पक्षाने यावर अधिकृतरित्या भाष्य केलं आहे. परंतु अक्षय कुमारचे भाजपाबरोबर चांगले संबंध आहेत अन् यामुळेच अक्षयला यावेळी तिकीट मिळू शकतं असंही सांगितलं जात आहे. अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाचे प्रमोशन तेव्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते.

सोशल मीडियावर मात्र सध्या या गोष्टीवर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. याआधीही अक्षयने तो राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कॉमेंट करत अभिनेत्यांनी राजकारणात न पडलेलंच बरं असं म्हणत अक्षयची बाजू घेतली आहे. अक्षयच्या बरोबरीनेच कंगना रणौत हीदेखील यंदा भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. आधीच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये कंगनाने तिच्या राजकीय विचारांबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. अद्याप कंगनानेही या गोष्टीची पुष्टी केलेली नाही.

Story img Loader