दिग्दर्शक अनुराग कश्यपला खरी ओळख मिळवून दिली ती ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने. हे खुद्द अनुरागनेदेखील बऱ्याच मुलाखतीत कबूल केलं आहे. या चित्रपटामुळे नवे कलाकार, अभिनेते, लेखक यांची एक फळीच तयार झाली. पण तो चित्रपट एवढा सुपरहीट होऊनसुद्धा ‘गॅंग्स ओफ वासेपूर’मुळे कोणालाच आर्थिक फायदा झाला नसल्याचंही अनुरागने मध्यंतरी वक्तव्य केलं होतं. आता याच चित्रपटाचा लेखक झीशान कादरी याने ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या तिसऱ्या भागाबद्दल वक्तव्य केलं आहे.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ची कथा आणि पटकथा लिहिण्यात अनुरागसह झीशानचंही प्रचंड योगदान आहे. या चित्रपटात झीशानने छोटी पण महत्त्वाची भूमिकादेखील केली आहे, पण अभिनयाबरोबरच त्याच्या लिखणाचीची खूप प्रशंसा झाली. आता झीशानने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान ‘गँग्स ऑफ वासेपूर ३’बद्दल वक्तव्य केलं आहे. अनुराग कश्यप आणि झीशान आणि इतर काही लोकांनी या तिसऱ्या भागावर काम सुरू केलं होतं पण काही कारणास्तव ते काम रखडल्याचंही झीशानने स्पष्ट केलं.

devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
Mangesh Desai And Prasad Oak
गुवाहाटीला काय चर्चा झाली हे ‘धर्मवीर २’ मध्ये दिसणार का? निर्माते म्हणाले, “सिनेमा बघितल्यानंतर सगळ्यांचे दृष्टिकोन बदलणार”
Navra Maza Navsacha 2 Bharud song Viral
Navra Maza Navsacha 2: “मुकूट घालीन ५० खोक्यांचा…”, सिद्धार्थ जाधवचं बाप्पाला साकडं; व्हायरल होणाऱ्या भारूडात राजकीय चिमटे, ऐका…
Prabhatai, Hariprasad Chaurasia, Prabhatai Atre,
संगीत हेच प्रभाताईंचे पहिले प्रेम, पं. हरिप्रसाद चौरासिया यांची भावना
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Prajkata Mali
“अत्यंत स्वाभिमानी…”, प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’विषयी खुलासा; म्हणाली, “पुण्यात आल्यावर शास्त्रीबुवांचा परीसस्पर्श…”
book review my journey in lyrics and music memoir of syed aslam noor
 ‘पॉपी’ पर्वाचे पुराण…

आणखी वाचा : सीमा हैदरला चित्रपटात काम देण्यावरुन मनसे आक्रमक; अमेय खोपकर म्हणाले, “हे असले तमाशे…”

आऊटलूकशी संवाद साधतांना झीशान म्हणाला, “आम्ही लॉकडाउनदरम्यान ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या तिसऱ्या भागाबद्दल चर्चा केली. जेव्हा काहीच घडत नव्हतं त्यामुळे अनुराग चांगलाच अस्वस्थ झाला. अद्याप तरी तो विषय बाजूलाच पडला आहे. यावार अनुरागच काहीतरी निर्णय घेईल. कदाचित तो याचं दिग्दर्शन करेल किंवा मी करेन, किंवा अनुराग फक्त निर्माता म्हणूनच यात सहभागी होईल. त्यामुळे याबद्दल मीतरी काहीच ठोस माहिती देऊ शकत नाही.”

‘गँग्स ऑफ वासेपूर’ला अभूतपूर्व यश मिळालं पण अनुराग कश्यपला मात्र याचा चांगलाच फटका बसला. जेव्हा या चित्रपटाला ७ वर्षं पूर्ण झाली तेव्हासुद्धा २०१९ मध्ये अनुरागने असंच एक विचित्र ट्विट केलं होतं. या ट्विट मध्ये तो म्हणतो, “७ वर्षांपूर्वी याच दिवशी माझ्या आयुष्यात साडे साती सुरू झाली. तेव्हापासून सगळ्यांना माझ्याकडून सतत अशाच प्रकारचं काम अपेक्षित आहे. लोकांच्या या अपेक्षांपासून अलिप्त राहायचा मी प्रयत्न करतोय. आशा करतो ही साडे साती या वर्षाअखेरीपर्यंत संपेल.”