भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां सध्या चर्चेत आहेत. २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं, २०१८ मध्ये हसीनने शमीवर घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे काही गंभीर आरोप केले होते, त्यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. दोघांनी अजूनही घटस्फोट घेतलेला नाही. हसीन आता पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. एक्सप्रेसमधील तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्यावर तिने आरोप केल्याचं समोर आलं आहे.

शुक्रवारी हसीनने रेल्वेच्या तिकीट तपासणाऱ्या स्टाफवर गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. तिच्या म्हणण्यानुसार गुरुवारी बिहार ते कलकत्ता ट्रेनमधून प्रवास करणाताना तिच्याशी गैरव्यवहार झाल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. हसीन आपल्या नातेवाईकांच्या एका लग्नसोहळ्यासाठी बिहार ते कलकत्ता प्रवास करत होती.

mumbai police started inquiry to ranveer allahabadias and Samay Raina on obscene and controversial statement
वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : यूट्यूबर रणवीर अलाहबादिया व समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
mumbai police started inquiry to ranveer allahabadias and Samay Raina on obscene and controversial statement
वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : यूट्यूबर रणवीर अलाहबादिया व समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले
saif ali khan Sharmila Tagore
मुलाची मृत्यूशी झुंज, आईने गायली अंगाई; सैफ अली खान शर्मिला टागोर यांच्याबद्दल काय म्हणाला?
khushi kapoor junaid khan
“अनेक विचित्र गोष्टी…”, खुशी कपूर आणि जुनैद खान एआयच्या गैरवापरावर झाले व्यक्त; म्हणाले, “लोकांनी स्वत:ला…”
Saif Ali Khan Attack: Mumbai Police Conducts Identification Parade for Suspect Shariful Islam in Arthur Road Jail
सैफ हल्ला प्रकरणः नर्स लीमा आणि आया जुनू यांनी ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले
Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”

आणखी वाचा : प्रभासच्या आगामी ‘सालार’ चित्रपटात झाली पृथ्वीराजची एंट्री; फर्स्ट लूक व्हायरल

कलकत्त्याला जाणाऱ्या जोगबानी एक्सप्रेसमध्ये हसीनला बरचा बर्थ मिळाला होता, खरंतर खालची जागा रिकामी असल्याने एका सहप्रवाशाचया संमतीने हसीन खालच्या बर्थवर बसली होती. रात्रीच्या दरम्यान मालदा स्टेशनजवळ रेल्वेच्या काही तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिच्याशी गैरव्यवहार केला आणि अभद्र भाषेचा वापरही केल्याचं हसीनने स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर त्या लोकांनी तिचा मोबाईलही फेकून दिला. नंतर फरक्का रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये हसीनने याबाबत तक्रार नोंदवली.

२०१८ मध्ये हसीनने शमीवर असेच गंभीर आरोप लावले होते. घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि मॅच फिक्सिंग यासारखे गंभीर आरोप तिने शमीवर लावले होते.यापैकी कोणताही आरोप अजून सिद्ध झालेला नाही. बीसीसीआयने चौकशी करून शमीला निर्दोष ठरवून त्याला खेळण्याची परवानगी दिली आहे. हसीन लग्नाच्या आधी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. तिने काही काळ मनोरंजनसृष्टीतही काम केलं आहे.

Story img Loader