गेल्या काही वर्षांत आपल्याकडे सण आणि उत्सवांतील उन्माद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मग ती दहीहंडी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो, धुळवड असो किंवा आणखीन काही. हा करतो म्हणून मग तोही करतो.. अशा ईष्र्येतून आता सर्वधर्मीय आपापले सण व उत्सव रस्त्यावर येऊन साजरे करू लागले आहेत. त्यातही एकमेकांशी चढाओढ करत सगळे नियम धाब्यावर बसवून, या सण-उत्सवांतील पारंपरिकतेला फाटा देत जो-तो त्याचा ‘इव्हेन्ट’ करण्याच्या मागे लागलेला आहे. त्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. ध्वनी, वायू तसंच जलप्रदूषण, एखाद्याचा हकनाक जीव गमावण्याची शक्यता, उत्सव ‘साजरा’ करण्याच्या नादात सर्वसामान्यांना त्यातून होणारा शारीरिक-मानसिक-आरोग्याचा त्रास या कशा-कशाचाही विचार न करता हे सण साजरे करणं सुरू असतं. हल्ली काही सुजाण मंडळी याविरोधात न्यायालयात दाद मागू लागली आहेत. परंतु न्यायालयांनी त्यांच्या बाजूने निर्णय देऊनसुद्धा सरकार आणि पोलीसही न्यायालयाच्या या निर्णयांचा आदर न करता मूठभरांच्या झुंडशाहीपुढे वाकताना दिसतात. सगळेच राजकीय पक्ष या गुंडपुंडांचं समर्थन करताना दिसतात. खरं तर सणांचं हे ‘इव्हेन्टी’करण करण्यात त्यांचाच बहुतेक वेळा पुढाकार असतो. स्वाभाविकपणेच ते समाजहिताची कसलीही चाड न बाळगता असे ‘इव्हेन्ट’ साजरे करत असतात. सत्तेत असलेला पक्षही आपली तथाकथित मतपेढी सांभाळण्यासाठी या भीषण ‘इव्हेन्ट्स’ना संरक्षक कवच बहाल करत असतो. आता तर काय, हिंदुत्ववादाचा उघड पुरस्कार करणारेच सत्तेत असल्याने असल्या वेडाचारांस ऊत आला तर त्यात नवल ते काय? तर ते असो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा