नागराज मंजुळे नावाच्या मराठमोळ्या माणसाचे दिग्दर्शन असलेली तिसरी कलाकृती, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे एरव्ही चित्रपटातील नायक-नायिकांच्या फुटपट्टीत कुठेही बसले नसते असे दोन नवोदित कलाकार, अजय-अतुलचे संगीत आणि प्रेमकथा एवढाच जामानिमा घेऊन आलेला ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे विचारांचं एकच सैराट वादळ सुरू झालं. या चित्रपटाने समाजातील सगळ्याच स्तरांतून एक संवाद सुरू केला. मात्र त्याहीपेक्षा चित्रपटाची लांबी, गाणी, ग्रामीण संवाद आणि धक्कादायक शेवट असे सगळे मुद्दे पार करून जेव्हा या चित्रपटाने तिकीटबारीवर ८५ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली तेव्हा हे ‘सैराट’ वादळ हिंदीतही घुसलं. इतकी छोटी शिदोरी घेऊन आलेला एखादा मराठी चित्रपट हिंदीला टक्कर देईल, अशी कल्पना त्यांनीही केली नव्हती आणि खुद्द नागराजनेही केली नाही. मात्र हे अद्भुत घडलं आहे. ‘सैराट’मुळे एकूणच नागराजचं बदललेलं जीवन, या चित्रपटावरून सुरू झालेले अनेक वादविवाद, चित्रपटाच्या नायक-नायिकेपासून ते त्याच्या शेवटापर्यंत तयार झालेल्या दंतकथा या सगळ्यांवर नागराज मंजुळेशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाच्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या व्यासपीठावरून मिळाली. नागराजच्या या कधी गंभीरपणे, कधी मिश्कील चिमटे घेत समजावून सांगितलेल्या ‘सैराट’ गप्पा..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा