बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान कित्येक वर्षांपासून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आला आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. दरवर्षी तो असा एक चित्रपट घेऊन येतो, जो प्रेक्षकांच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतो. आमिर खान आज आपला ५७वा जन्मदिन साजरा करत आहे. त्याने आपल्या आयुष्याची ३० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज तो बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय आणि नावाजलेल्या चेहऱ्यांपैकी एक आहे. परंतु आमिर खानने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अथक परिश्रम केले आहेत. त्यावेळी त्यांने पडेल ते काम करण्याची तयारीही दाखवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमिर खान आता जितका प्रसिद्ध आहे तितका तो आधी नव्हता. एक लहान कलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याकाळी आमिरला खूप कमी लोक ओळखायचे. तेव्हा सोशल मीडियासारखी माध्यमे देखील नव्हती. त्याकाळी तो रस्त्यावर फिरून स्वतः आपल्या चित्रपटाचे पोस्टर रिक्षावर चिटकवायचा. सध्या यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

The Kashmir Files : ‘देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून…’ काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे भाजपावर टीकास्त्र

आमिर खानने १९७३ मध्ये ‘यादों की बारात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ‘मदहोश’ आणि ‘होली’ या चित्रपटात त्याने काम केले. मात्र, १९८८ च्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून आमिर खानने अधिकृतरीत्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात जुही चावलाही मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलिएटपासून प्रेरित होता. या चित्रपटाच्या यशासाठी आमिर खानने सर्वतोपरी प्रयत्न केले होते, तो प्रयत्नही यशस्वी झाला आणि चित्रपट हिट झाला.

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला परिचयाची गरज नाही. आपल्या अभिनयाने त्याने चित्रपट विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. २००३ मध्ये भारत सरकारने त्याला पद्मश्री आणि २०१० मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले. एवढेच नाही तर चीन सरकारने २०१७ मध्ये ही मानद पदवीही दिली होती.

आमिर खान आता जितका प्रसिद्ध आहे तितका तो आधी नव्हता. एक लहान कलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याकाळी आमिरला खूप कमी लोक ओळखायचे. तेव्हा सोशल मीडियासारखी माध्यमे देखील नव्हती. त्याकाळी तो रस्त्यावर फिरून स्वतः आपल्या चित्रपटाचे पोस्टर रिक्षावर चिटकवायचा. सध्या यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

The Kashmir Files : ‘देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून…’ काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे भाजपावर टीकास्त्र

आमिर खानने १९७३ मध्ये ‘यादों की बारात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ‘मदहोश’ आणि ‘होली’ या चित्रपटात त्याने काम केले. मात्र, १९८८ च्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून आमिर खानने अधिकृतरीत्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात जुही चावलाही मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलिएटपासून प्रेरित होता. या चित्रपटाच्या यशासाठी आमिर खानने सर्वतोपरी प्रयत्न केले होते, तो प्रयत्नही यशस्वी झाला आणि चित्रपट हिट झाला.

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला परिचयाची गरज नाही. आपल्या अभिनयाने त्याने चित्रपट विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. २००३ मध्ये भारत सरकारने त्याला पद्मश्री आणि २०१० मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले. एवढेच नाही तर चीन सरकारने २०१७ मध्ये ही मानद पदवीही दिली होती.