भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करत आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या देशभक्तीसाठी ओळखले जातात.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या देशभक्तीसाठी ओळखले जातात. यातील एक महत्वाचे नाव म्हणजे फिरोज खान. ज्यांनी थेट पाकिस्तानात भरलेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली होती. अभिनय आणि संवाद फेकीसाठी प्रसिद्ध असलेले फिरोज खान एप्रिल २००६मध्ये त्यांचा भाऊ अकबर खान यांच्या ‘ताजमहाल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी (लाहोर) पाकिस्तानला गेले होते. तिथे त्यांनी भारताचे कौतुक केले होते.

Kiran Samant On Rajan Salvi
Kiran Samant : “…म्हणून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही”, किरण सामंत यांचा राजन साळवींबाबत मोठा दावा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sanam Teri Kasam actress Mawra Hocane married to Pakistani actor Ameer Gilani
‘सनम तेरी कसम’च्या सरूने केलं लग्न, पाकिस्तानी अभिनेत्री मावराने निकाहचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिला सुखद धक्का
Chiki Chiki Bubum bum marathi movie
चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; बॅकबेंचर्स मित्रमंडळींच्या रियुनियनची धमाल मस्ती
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
who is rakhi sawant future husband pakistani actor dodi khan
राखी सावंत आता पाकिस्तानची होणार सून! अभिनेत्रीचा होणारा नवरा डोडी खान आहे तरी कोण? जाणून घ्या…

‘आमिर खानचं करिअर संपलं’ म्हणत केआरकेने शाहरुख-सलमानलाही दिला ‘हा’ इशारा

कार्यक्रमादरम्यान दरम्यान फिरोज खान यांनी पाकिस्तानच्या भूमीवर भारताचे कौतुक केले होते आणि म्हटले होते – भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. तिथे मुस्लिमांची प्रगती होत आहे. आमचे राष्ट्रपती मुस्लिम, पंतप्रधान शीख. इस्लामच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली, पण इथल्या मुस्लिमांची काय अवस्था आहे. ते आपापसात भांडत आहेत. याच कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानी निवेदक फखर-ए-आलमने अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर फिरोज खान संतापले. त्यांनी निवेदकाला फटकारले आणि म्हणाले, ‘तुम्ही मनीषा कोईरालाची माफी मागितली पाहिजे’.

फिरोज खान यांचे हे वागणे निवेदक फखर-ए-आलम आणि तेथे बसलेल्या अनेक पाकिस्तानींना इतके घृणास्पद वाटले की त्यांनी पाकिस्तानात आल्यावरच फिरोज खान यांच्यावर बंदी घातली होती. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांना फिरोज खान यांना पाकिस्तानचा व्हिसा न देण्याचे आदेश दिले होते.

कार्यक्रमादरम्यान फिरोज खान म्हणाले होते – मी येथे स्वतःहून आलो नाही, मला बोलावले आहे. आमचे चित्रपट इतके शक्तिशाली आहेत की तुमचे सरकार त्यांना जास्त काळ रोखू शकत नाही. मात्र, या घटनेनंतर महेश भट्ट यांनी फिरोज खानच्या वतीने निवेदक फखर-ए-आलम आणि पाकिस्तानी जनतेची माफी मागितली होती.

फिरोज खान यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात ६०-७० च्या दशकात केली होती. वेलकम चित्रपटातील आरडीएक्स ही त्यांची व्यक्तीरेखा विशेष गाजली होती. फिरोज खान यांचे एप्रिल २००९ मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे बंगळुरूमध्ये निधन झाले. फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान हा देखील बॉलिवूडमधला प्रसिद्ध अभिनेता आहे.

Story img Loader