तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. ते २ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी समाजातील विषमता आणि सनातन धर्म यावर भाष्य केलं. या भाषणादरम्यान त्यांनी सनातन धर्माची मलेरिया, डेंग्यू आणि करोना विषाणूशी तुलना केली. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिकाही मांडली. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला. त्यांच्या याच वक्तव्यावर आता कमल हासन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘जवान’ची ग्रँड ओपनिंग! शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोडला ‘पठाण’चा रेकॉर्ड, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

dr tara bhawalkar honored with loksatta durga lifetime achievement award
माणसातील जनावर अजूनही जिवंत आहे; डॉ. तारा भवाळकर यांची स्पष्टोक्ती ;‘ लोकसत्ता दुर्गां’चा गौरव सोहळा
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ…
amit thackeray
“…तेव्हा माझ्या पोटात गोळा आला”; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!
Accusation between BJP and Thackeray group over 37 acre plot Mumbai
भाजप, ठाकरे गट यांच्यात आरोपप्रत्यारोप; ३७ एकरच्या भूखंडावर शिवसेनेचा डोळा- शेलार
baba siddique shot dead
“माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा, तो मुंबईला…”; बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया!
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”

ट्वीट करत कमल हासन म्हणाले, “नागरिकांची एखाद्या गोष्टीशी असहमत असण्याची आणि सतत चर्चा करण्याची क्षमता हे खऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. इतिहासाने आपल्याला वारंवार हे शिकवले आहे की, योग्य प्रश्न विचारल्याने अनेक महत्त्वपूर्ण उत्तरे मिळतात आणि एक चांगला समाज म्हणून आपल्या विकासात योगदान दिले आहे.”

उदयनिधींच्या ‘सनातन धर्मा’वरील वक्तव्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी, सर्व मंत्र्यांना म्हणाले…

पुढे ते म्हणाले, “उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्मावरील त्यांची मतं मांडण्याचा हक्क आहे. जर तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनाशी असहमत असाल तर त्यांना धमक्या देण्याचा किंवा कायदेशीर बाबीत अडकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तसेच संकुचित राजकीय फायद्यासाठी लोकांना भावनिक करण्यासाठी त्याच्या शब्दांचा विपर्यास करण्याऐवजी सनातनवर आधारित चर्चेत भाग घेणे महत्त्वाचे आहे.”

पुढे कमल हासन म्हणाले, “तमिळनाडू हे मोकळ्या वातावरणातील चर्चांसाठी नेहमीच सुरक्षित स्थान राहिले आहे आणि ते पुढेही राहील. सर्वसमावेशकता, समानता आणि प्रगती करून आपल्या परंपरांचे मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे. सुसंवादी आणि सर्वसमावेशक समाजाला चालना देण्यासाठी चला योग्य ती चर्चा करूया.”

उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले होते?

“सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं,” असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते.