केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत एक विचित्र प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. स्मृती इराणी यांनी लिहिलेलं एक पुस्तक नुकतच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी स्मृती इराणी प्रसिद्ध अशा कपिल शर्माच्या कार्यक्रमामध्ये येणारा होत्या. मात्र आता त्यांनी आता या शोमध्ये न येण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार स्मृती इराणी जेव्हा शुटिंगनिमित्त सेटवर जाण्यासाठी पोहचल्या तेव्हा त्यांना गेटवरील सुरक्षारक्षकाने ओळखलं नाही आणि आतमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. स्मृती इराणी या त्यांच्या गाडीने या शुटिंगसाठी पोहचल्या होत्या. मात्र सेटच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकाने त्यांची गाडी आडवली. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि इराणी यांच्या गाडीच्या ड्रायव्हरमध्ये बराच वेळ वाद झाला. अखेर संतापलेल्या स्मृती यांनी शुटिंग न करताच परतण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा