‘प्रेम’ संकल्पनेवर आजवर असंख्य नाटकं आली आहेत. हा तसा आदि अन् अंतही नसलेला विषय. मूलत: भिन्नलिंगी व्यक्तीच्या प्रेमात पडणं ही मनुष्यजातीची आदिम प्रेरणा आहे. त्यामुळे हा विषय सदा चिरतरुण राहिलेला आहे. देश-काल-परिस्थितीनुसार तपशिलात थोडाफार फरक होत असेल तेवढाच. त्यामुळे प्रेमावरील कलाकृतींची निर्मिती सतत होताना दिसते. अथर्व थिएटर्स निर्मित अशा काही ‘प्रेम’कथांचा गुच्छ नुकताच ‘कुछ मिठा हो जाए’ या शीर्षकान्वये रंगमंचावर आला आहे. प्रेमाच्या नाना तऱ्हा त्यात पाहायला मिळतात. अंबर हडप, गणेश पंडित, अभिजीत गुरू, शिरीष लाटकर आणि आशीष पाथरे या लेखकांनी हे प्रेमानुभव लिहिले आहेत. प्रेक्षकांचं दोन घटका रंजन करण्याच्या हेतूनंच ते लिहिले गेले आहेत. स्वाभाविकपणेच ते खमंग, चटपटीत आहेत. गांभीर्याचा आव आणणाऱ्या कथित प्रेमगोष्टींतही हा ‘स्मार्ट’नेस जाणवतो. अर्थात टाइमपास म्हणून नाटकाला आलेल्यांचं त्यातून मनोरंजन होणं महत्त्वाचं. मर्यादित अर्थानं तसं ते होतंही. याचं कारण प्रेक्षकांना हल्ली चुटकुल्यांमध्येच रस वाटतो. मेंदूला झिणझिण्या आणणारं, त्यावर विचार करायला लावणारं, अंतर्मुख करणारं अथवा आपल्या जीवनजाणिवा समृद्ध करू पाहणारं असलं काही त्यांना ‘बोअर’ करतं. आधीच नित्याच्या दैनंदिन व्याप-तापांनी ते कावलेले असतात. त्यातून त्यांना सुटका हवी असते. ‘कुछ मिठा हो जाए’सारखी स्मार्ट नाटकं त्यांना विरंगुळ्याचे ते दोन क्षण पुरवतात. तेवढंच त्यांना पुरेसं असतं. अर्थात् रंजन हीसुद्धा मानवी गरज आहेच. असो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा