अभिनेत्री विद्या बालन, परमब्रता चॅटर्जी आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांची मुख्य भूमिका असलेला ‘कहानी’ हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वोत्तम सस्पेन्स थ्रिलर्स पैकी एक ठरला. दिग्दर्शक सुजॉय घोष यांचा कहानी हा चित्रपट २०१२ साली रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाची रोमांचकारी पटकथा, विलक्षण आणि जबरदस्त दिग्दर्शन, धक्कादायक क्लायमॅक्स याची प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पडली. कहानी सिनेमा पाहून चित्रपट समीक्षकही आश्चर्यचकित झाले. अभिनेत्री विद्या बालनच्या ‘विद्या बागची’च्या भूमिकेतील अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आवाजाच्या माध्यमातून योगदान दिले. दरम्यान, फक्त आठ कोटी रुपयांमध्ये बनलेल्या ब्लॉकबस्टर कहानी चित्रपटाने जगभरामध्ये १०४ कोटी रुपयांची कमाई केली. हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस चालला. दिग्दर्शक सुजय घोष यांचा हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम सस्पेन्स थ्रिलर म्हणून ओळखला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा